शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्र कार्यालयातून पंचनामा बेपत्ता

By admin | Updated: February 14, 2016 02:00 IST

अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देता यावे म्हणून अर्ज करण्यात आला. यात सातबाऱ्यानुसार सदर जमीन वन विभागाची असल्याचे सांगण्यात आले.

वर्ष लोटूनही पट्टे वाटप प्रक्रिया रखडलीविजयगोपाल : अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देता यावे म्हणून अर्ज करण्यात आला. यात सातबाऱ्यानुसार सदर जमीन वन विभागाची असल्याचे सांगण्यात आले. यावरून वन विभागाकडे अर्ज करण्यात आला. यावर चौकशी व पाहणी होऊन अहवाल सादर करण्यात आला; पण आता तो अहवालच मिळत नसल्याने ग्रामस्थांची गोची झाली आहे. वर्ष लोटूनही पट्टे न मिळाल्याने शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.येथील अतिक्रमण धारकांना पट्टे देता यावे म्हणून सरपंच व गामस्थांनी तहसीलदार देवळी यांना अर्ज केले. यावर तहसीलदारांनी कारवाईसाठी अर्ज तलाठ्याकडे पाठवून माहिती मागविली. अतिक्रमण झालेली जागा जागा सातबाऱ्यानुसार झुडपीत येत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात चौकशी केली असता ती जागा वन विभागात येत नसल्याचे दिसून आले. यामुळे सरपंच निलम बिन्नोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा यांच्याकडे १७ मार्च २०१५ रोजी अर्ज सादर केला. या अर्जावरून राऊंड आॅफिसर मानकर यांनी चौकशी व मौका पाहणी केली. याबाबतचा अहवाल त्यांनी २५ मार्च २०१५ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्धा यांच्याकडे सोपविला. पूढे यावर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे सरपंच बिन्नोड यांनी संबंधित कार्यालयात चौकशी केली असता मानकर यांनी दिलेला पंचनामा गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. एक वर्षापूर्वी केलेल्या अर्जाची अधिकारी, कर्मचारी दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले. अतिक्रमण धारकांना कायम पट्टे न मिळाल्याने त्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आठ दिवसांत या प्रकरणाचा निपटारा झाला नाही तर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सरपंच निलम बिन्नोड यांनी निवेदनातून दिला आहे.(वार्ताहर)