शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:07 IST

पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांत १२ जनावरे ठार : वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.पाण्याच्या शोधार्थ सध्या अनेक वन्यप्राणी गाव आणि शेतशिवारांकडे आपला मोर्चा वळवित आहेत. अशातच गोठ्यातील आणि शेतात बांधून असलेल्या जनावरांना गतप्राण करण्याचा सपाटा बिबट्याने लावल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे. असे असले तरी बिबट्याही विविध गावांच्या परिसरात प्रवेश करून आपली दहशत कायम ठेवत आहे. सोमवार २० मे रोजी रात्री बेलोरा (बु.) येथील शेतकरी रवींद्र जाणे यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने ठार केले. हे वासरू गोठ्यात बांधून होते. सकाळी ही घटना लक्षात आली. माहिती मिळताच सरपंच मिलिंद जाणे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक रसिका अवथळे यांना माहिती दिली.वाघाने पाडला बकरीचा फडशाबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील बोरी गावातील एका शेळीपालकाच्या मालकीच्या बकरीवर पट्टदार वाघाने हल्ला करून तिला गतप्राण केले. या घटनेमुळे शेळीपालक नरेश किरडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरात पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे.बोरी येथील नरेश किरडे हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात गावातील बकºया चारण्यासाठी गेले होते. दरम्यान झुडूपात दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने बकºयांच्या कळपावर हल्ला केला. शिवाय एका बकरीला गतप्राण केले. आरडा-ओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर इतर बकºयांना एकत्र करीत त्यांना गावाच्या दिशेने हाकलण्यात आल्याने इतर बकºयांचे प्राण बचावले. वाघाने बकरी गतप्राण केल्याने शेळीपालकाचे ९ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी घेतली आहे. नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.वनविभागही हतबलया परिसरात वनविभागाच्यावतीने गस्त घातली जात आहे. मात्र, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर, पिलपूर, येनाडा, लहान आर्वी, जैतापूर या गावाच्या हद्दीत बिबट्या काळोखाचा फायदा घेत प्रवेश करून पाळीव जनावरांना ठार करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरात सध्या दोन बिबट्यांचा मुक्तसंचार होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.वन्यप्राणी गावाकडे फिरकतात यासाठी गस्त लावली आहे. मात्र, रात्रीला बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गस्तही वाढविण्यात आली आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).