शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:07 IST

पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांत १२ जनावरे ठार : वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पूर्वीच या परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासह पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच मागील १५ दिवसांत १२ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याप्र्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.पाण्याच्या शोधार्थ सध्या अनेक वन्यप्राणी गाव आणि शेतशिवारांकडे आपला मोर्चा वळवित आहेत. अशातच गोठ्यातील आणि शेतात बांधून असलेल्या जनावरांना गतप्राण करण्याचा सपाटा बिबट्याने लावल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे. असे असले तरी बिबट्याही विविध गावांच्या परिसरात प्रवेश करून आपली दहशत कायम ठेवत आहे. सोमवार २० मे रोजी रात्री बेलोरा (बु.) येथील शेतकरी रवींद्र जाणे यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने ठार केले. हे वासरू गोठ्यात बांधून होते. सकाळी ही घटना लक्षात आली. माहिती मिळताच सरपंच मिलिंद जाणे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक रसिका अवथळे यांना माहिती दिली.वाघाने पाडला बकरीचा फडशाबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील बोरी गावातील एका शेळीपालकाच्या मालकीच्या बकरीवर पट्टदार वाघाने हल्ला करून तिला गतप्राण केले. या घटनेमुळे शेळीपालक नरेश किरडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरात पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे.बोरी येथील नरेश किरडे हे नेहमीप्रमाणे शेत शिवारात गावातील बकºया चारण्यासाठी गेले होते. दरम्यान झुडूपात दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने बकºयांच्या कळपावर हल्ला केला. शिवाय एका बकरीला गतप्राण केले. आरडा-ओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर इतर बकºयांना एकत्र करीत त्यांना गावाच्या दिशेने हाकलण्यात आल्याने इतर बकºयांचे प्राण बचावले. वाघाने बकरी गतप्राण केल्याने शेळीपालकाचे ९ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी घेतली आहे. नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.वनविभागही हतबलया परिसरात वनविभागाच्यावतीने गस्त घातली जात आहे. मात्र, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर, पिलपूर, येनाडा, लहान आर्वी, जैतापूर या गावाच्या हद्दीत बिबट्या काळोखाचा फायदा घेत प्रवेश करून पाळीव जनावरांना ठार करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या परिसरात सध्या दोन बिबट्यांचा मुक्तसंचार होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.वन्यप्राणी गावाकडे फिरकतात यासाठी गस्त लावली आहे. मात्र, रात्रीला बिबट पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गस्तही वाढविण्यात आली आहे.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).