शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

‘त्या’ फलकाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 2, 2017 00:46 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे.

दर्शनी भागावर फाटका फलक : बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कायम सेलू : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. मागील चार महिन्यांपासून या फलकाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची माहिती फलकावर दिलेली आहे. कोणत्या कामासाठी कोणते अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत, त्यांच्या कामाचा कार्यपूर्तीचा कालावधी किती, विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी हे दर्शविणारा लांबलचक फलक प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे; पण येथील फलकाची दुरवस्था झाली आहे. फलकाकडे दुर्लक्ष होत असतानाच या फलकावरील गटविकास अधिकारी ए.के. तेलंग, सहायक गटविकास अधिकारी एन.टी. खेरे, वरिष्ठ सहायक महेंद्र तडस, आर.जी. कंडे, विस्तार अधिकारी आर.डी. कांबळे, पंचायत विस्तार अधिकारी, जी.एल. माने, कृषी अधिकारी एन.आर. किटे, विस्तार अधिकारी टी.एस. सातघरे यांची नावे कायम आहेत. हे अधिकारी बदली होवून अन्यत्र रूजू झाले आहेत. यातील एन.आर. किटे हे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेत तर टी.एस. सातघरे, कारंजा पंचायत समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी, आर.डी. कांबळे वर्धा पंचायत समितीत तर जी.एस. माने आर्वी पं.स. मध्ये कार्यरत आहेत. शासनाने नागरिकांची सनद या शिर्षकाखाली नागरिकांना कार्यालयात आल्यावर माहिती अवगत व्हावी म्हणून लावलेल्या फलकाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कार्यालयात आल्यावर नागरिकांना फलकावरील नावाची व्यक्तीच येथे कार्यरत नसल्याने विचारणा करावी लागते. फलकावरील माहिती अद्यावत करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) माहिती अद्यावत करण्याचा विभागाला पडला विसर अधिकारी व पदाधिकारी बदलून आल्यास त्यांच्या नावाची पाटी त्वरित बदलली जाते; पण नागरिकांच्या कामाशी संलग्नित असणाऱ्या या फलकावरील अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात दिरंगाई केली जात आहे. महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फलकाकडे होत असलेले दुर्लक्ष शोकांतिकाच असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. हा फाटलेला फलक त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणीही होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची विचारणा करावी लागत आहे. फलकावर अद्यावत माहिती नसून फलक फाटला असल्याने त्यावरील मजकूर दिसेनासा झाला आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता फलकाची दुरुस्ती करणे गरजेचे ठरत आहे.