शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ फलकाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 2, 2017 00:46 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे.

दर्शनी भागावर फाटका फलक : बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कायम सेलू : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. मागील चार महिन्यांपासून या फलकाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची माहिती फलकावर दिलेली आहे. कोणत्या कामासाठी कोणते अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत, त्यांच्या कामाचा कार्यपूर्तीचा कालावधी किती, विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी हे दर्शविणारा लांबलचक फलक प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे; पण येथील फलकाची दुरवस्था झाली आहे. फलकाकडे दुर्लक्ष होत असतानाच या फलकावरील गटविकास अधिकारी ए.के. तेलंग, सहायक गटविकास अधिकारी एन.टी. खेरे, वरिष्ठ सहायक महेंद्र तडस, आर.जी. कंडे, विस्तार अधिकारी आर.डी. कांबळे, पंचायत विस्तार अधिकारी, जी.एल. माने, कृषी अधिकारी एन.आर. किटे, विस्तार अधिकारी टी.एस. सातघरे यांची नावे कायम आहेत. हे अधिकारी बदली होवून अन्यत्र रूजू झाले आहेत. यातील एन.आर. किटे हे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेत तर टी.एस. सातघरे, कारंजा पंचायत समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी, आर.डी. कांबळे वर्धा पंचायत समितीत तर जी.एस. माने आर्वी पं.स. मध्ये कार्यरत आहेत. शासनाने नागरिकांची सनद या शिर्षकाखाली नागरिकांना कार्यालयात आल्यावर माहिती अवगत व्हावी म्हणून लावलेल्या फलकाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कार्यालयात आल्यावर नागरिकांना फलकावरील नावाची व्यक्तीच येथे कार्यरत नसल्याने विचारणा करावी लागते. फलकावरील माहिती अद्यावत करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) माहिती अद्यावत करण्याचा विभागाला पडला विसर अधिकारी व पदाधिकारी बदलून आल्यास त्यांच्या नावाची पाटी त्वरित बदलली जाते; पण नागरिकांच्या कामाशी संलग्नित असणाऱ्या या फलकावरील अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात दिरंगाई केली जात आहे. महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फलकाकडे होत असलेले दुर्लक्ष शोकांतिकाच असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. हा फाटलेला फलक त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणीही होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची विचारणा करावी लागत आहे. फलकावर अद्यावत माहिती नसून फलक फाटला असल्याने त्यावरील मजकूर दिसेनासा झाला आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता फलकाची दुरुस्ती करणे गरजेचे ठरत आहे.