शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फलकाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 2, 2017 00:46 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे.

दर्शनी भागावर फाटका फलक : बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कायम सेलू : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. मागील चार महिन्यांपासून या फलकाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची माहिती फलकावर दिलेली आहे. कोणत्या कामासाठी कोणते अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत, त्यांच्या कामाचा कार्यपूर्तीचा कालावधी किती, विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी हे दर्शविणारा लांबलचक फलक प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे; पण येथील फलकाची दुरवस्था झाली आहे. फलकाकडे दुर्लक्ष होत असतानाच या फलकावरील गटविकास अधिकारी ए.के. तेलंग, सहायक गटविकास अधिकारी एन.टी. खेरे, वरिष्ठ सहायक महेंद्र तडस, आर.जी. कंडे, विस्तार अधिकारी आर.डी. कांबळे, पंचायत विस्तार अधिकारी, जी.एल. माने, कृषी अधिकारी एन.आर. किटे, विस्तार अधिकारी टी.एस. सातघरे यांची नावे कायम आहेत. हे अधिकारी बदली होवून अन्यत्र रूजू झाले आहेत. यातील एन.आर. किटे हे एक वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेत तर टी.एस. सातघरे, कारंजा पंचायत समितीमध्ये सहायक गटविकास अधिकारी, आर.डी. कांबळे वर्धा पंचायत समितीत तर जी.एस. माने आर्वी पं.स. मध्ये कार्यरत आहेत. शासनाने नागरिकांची सनद या शिर्षकाखाली नागरिकांना कार्यालयात आल्यावर माहिती अवगत व्हावी म्हणून लावलेल्या फलकाकडे दुर्लक्ष करण्यात आले. कार्यालयात आल्यावर नागरिकांना फलकावरील नावाची व्यक्तीच येथे कार्यरत नसल्याने विचारणा करावी लागते. फलकावरील माहिती अद्यावत करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी) माहिती अद्यावत करण्याचा विभागाला पडला विसर अधिकारी व पदाधिकारी बदलून आल्यास त्यांच्या नावाची पाटी त्वरित बदलली जाते; पण नागरिकांच्या कामाशी संलग्नित असणाऱ्या या फलकावरील अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात दिरंगाई केली जात आहे. महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या फलकाकडे होत असलेले दुर्लक्ष शोकांतिकाच असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. हा फाटलेला फलक त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणीही होत आहे. नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर कोणत्या कामासाठी कुणाला भेटावे, याची विचारणा करावी लागत आहे. फलकावर अद्यावत माहिती नसून फलक फाटला असल्याने त्यावरील मजकूर दिसेनासा झाला आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता फलकाची दुरुस्ती करणे गरजेचे ठरत आहे.