शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
5
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
6
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
7
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
8
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
9
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
10
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
11
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
12
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
13
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
14
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
15
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
16
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
17
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
18
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
19
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
20
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

आजगावच्या पुलाची दैना

By admin | Updated: May 25, 2016 02:23 IST

आजगाव हे वायगाव (नि.) ग्रामपंचायतचा एक वॉर्ड असून येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष : अपघाताच्या घटनांत वाढवर्धा : आजगाव हे वायगाव (नि.) ग्रामपंचायतचा एक वॉर्ड असून येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वायगाव(नि.)पासून दोन किमी अंतरावर असलेले आजगाव हिंगणघाट-देवळी या मार्गावर असल्याने या रस्त्याला जोडण्यासाठी गाव नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल अतिवृष्टीत वाहून गेला. तीन वर्षांपासून पुलाची साधी डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. तीन वर्षांपूर्वी हा पूल खचला होता. वायगाव(नि.) ग्रामपंचायतीने येथे दगड व मुरुम टाकला होता. मात्र पहिल्याच पावसात दगड व मुरुम पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यानंतर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. आठ वर्षांपूर्वी या पुलाचे बआंधकाम केले. मात्र काही दिवसातच या पुलाच्या लोखंडी सळाखा बाहेर आल्या होत्या. यानंतर पुराच्या प्रवाहात पुलाचा बराचसा भाग वाहुन गेला. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.आजगाव मार्ग सिरसगाव(ध) येथील ग्रामस्थांना सोयीचा ठरतो. देवळी ते हिंगणघाट या मुख्य मार्गावर येण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा असल्याने वर्दळीचा आहे. आजगावसह सिरसगाव(ध) येथील ग्रामस्थांना या पुलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील ग्रामस्थांकरिता हा पूल महत्त्वाचा आहे. याचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे. नाल्याला पूर आल्यावर गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते. या पुलाच्या बांधकामाची तीन वर्र्षांपासून प्रतीक्षा आहे. अद्याप उपाययोजना करण्यात आल्या नाही. या मार्गावर किरकोळ अपघात घडतात. तुटलेल्या पुलामुळे दुचाकी घसरुन पडतात. स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीनी याची दखल घेत नसल्याने पुलाचे बांधकाम झाले नसल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.(तालुका प्रतिनिधी) पुलाची उंची वाढविण्याची मागणीआजगाव येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वायगाव(नि.) आणि वर्धा येथे जातात. त्यांना याच मार्गाने जावे लागते. आजगाववासीयांना पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो. नाल्याला पूर आल्यास आवागमन ठप्प होते. या पुलावर बैलबंडी घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पुलाच्यआ सळाखी बाहेर पडल्याने धोकादायक ठरत आहे. या पुलाचे त्वरीत बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.जिल्हा परिषद आराखड्यात या पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव दिला आहे. बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. काही महिन्यातच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.- मीना वाळके, जि.प.सदस्य, वायगाव(नि.)या पुलाच्या बांधकामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र यावर कोणीच लक्ष देत नाही. या पुलावरुन आवागमन करणे अडचणीचे झाले आहे. या पुलावर अपघातही झाले आहे. तीन वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाही.- संजय मोहर्ले, ग्रामस्थ, आजगाव,