शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

चंदीच्या दुधात ‘पाकिटाची’ भेसळ

By admin | Updated: June 5, 2016 01:45 IST

मुलांना शुद्ध आणि पौष्टिक दूध मिळावे, त्यात कुठलीही भेसळ नसावी, या आशेने नागरिक जवळपासच्या गावखेड्यातून

चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात : विश्वासू दूध विक्रेत्याकडूनच होतो ग्राहकांचा विश्वासघातरूपेश खैरी वर्धा मुलांना शुद्ध आणि पौष्टिक दूध मिळावे, त्यात कुठलीही भेसळ नसावी, या आशेने नागरिक जवळपासच्या गावखेड्यातून व काही शहरातील गोपालकांकडून दुधाची खरेदी करतात. हे दूध विक्रेत्याच्या घरच्या गायीचे असून ते शतप्रतिशत शुद्ध असल्याचा नागरिकांचा विश्वास असतोे; मात्र त्यांच्या घरी दूध आणणाऱ्या या दूध विक्रेत्याकडून त्यांचा विश्वासघात होत आहे, याची त्यांना पुसटशी कल्पना नाही. हे दूध विक्रेते घरून गाईचे दूध आणत असल्याचे म्हणत नारिकांच्या माथी पाकीटचे दूध मारत असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उजेडात आली आहे. आसपाच्या गावातून वर्धेत येत असलेल्या अनेक दूध विक्रेत्यांच्या अनेकांच्या घरोघरी महिनेवारी चंदी आहेत. त्यांच्याकडून आलेले दूध शुद्ध असल्याच्या खात्रीमुळे नागरिक त्याची कुठलीही शाहनिशा न करता ते आपल्या चिमुकल्यांना देत आहेत. यामुळे बालकांना दुधातून आवश्यक असलेले प्रोटिन्स मिळते, याबाबत साशंकता आहे. दुधाच्या नावावर नागरिकांना केवळ पांढऱ्या रंगाचे पाणी दिल्या जात आहे. याची पुसटशी कल्पनाही त्यांना नसावी. नागरिकांना शुद्ध दूध देण्याच्या नावावर वर्धेत हा गोरखधंदा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आसपासच्या गावातील हे दूध विक्रेते वर्धेत येताच आर्वी नाका किंवा बजाज चौक येथील पाकीटचे दूध विकणाऱ्यांकडून पाकीट विकत घेत ते एका छोट्या केटलीत गोळा करून मोठ्या केटलीत टाकत असतात. एवढेच नाही तर या दूधात पाणीही मिसळल्या जात आहे. यामुळे नागरिकांना मिळणारे दूध किती शुद्ध आणि किती पौष्टिक याचा अंदाज बांधणे कठिणच. हा प्रकार करताना आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या ग्राहकांचा आपण विश्वासघात करीत असल्याची साधी भीतीही त्यांना वाटत नाही. दिवस उन्हाळ्याचे असो वा हिवाळ्याचे हा व्यवसाय वर्षभर सुरूच असतो. वर्धेत बऱ्याच विक्रेत्यांकडून ही भेसळ सुरू असल्याची माहिती आहे. पाकीटचे दूध म्हटल्यावर पालक त्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करतात. यामुळे मुलांच्या दुधाकरिता या चंदीवाल्यांवर त्यांचाकडून विश्वास ठेवण्यात येतो; परंतु वर्धेत घडत असलेल्या या प्रकारामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात ७,९६० लिटरने घट उन्हाळ्याच्या दिवसात दूधाच्या उत्पादनात घट होणे स्वाभाविक आहे. वर्धेत इतर दिवसात सरासरी ४४ हजार ४६० लिटर दूधाचे उत्पादन होते. ही नोंद केवळ संकलन केंद्राची आहे. या व्यतिरिक्त चंदीच्या नावावर नागरिकांच्या घरी थेट जाणाऱ्या दुधाची कुठेही नोंद नाही. वर्धेत यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात सरासरी ३६ हजार ५०० लिटरची नोंद झाली आहे. यावरुन जिल्ह्यात एकूण ७ हजार ९६० लिटरने दुधाच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. यामुळे मागणीनुसार दूध देण्यासाठी हा खटाटोप आहे. तरीही वर्धेतून १४ हजार लिटर दुधाची निर्यातवर्धेत उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचे उत्पादन कमी होत असले तरी जिल्ह्यातून आजच्या घडीला अजूनही १४ हजार लिटर दूध निर्यात केले जात आहे. यात नागपूर जिल्ह्यात १० हजार ५०० तर अमरावती जिल्ह्यात ३ हजार ५०० लिटर दूध जात आहे. हे दूध जिल्ह्यात ठेवल्यास येथील मागणी पूर्ण होऊ शकते.