शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कुटुंबाच्या व्यथा, वेदना कायमच

By admin | Updated: May 31, 2017 00:54 IST

स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारातील दारूगोळ्याच्या प्रचंड साठ्यावर वसलेले हे पुलगाव शहर दिवस-रात्र

शहीद घोषित करण्याकडेही कानाडोळा : निवृत्ती वेतनाअभावी कुटुंबांची आबाळ लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारातील दारूगोळ्याच्या प्रचंड साठ्यावर वसलेले हे पुलगाव शहर दिवस-रात्र जीव मुळीत घेऊन मागील सात दशकांपासून दहशतीत जगत आहे. मागील काही वर्षांत घडलेल्या बॉम्बस्फोट व आगीच्या घटनांनी केंद्रीय दारूगोळा भांडारात जीवित हानी फार झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे; पण ३१ मे २०१६ ची काळरात्र शहरवासी कधीच विसरू शकत नाही. या अग्निस्फोटात १९ जवान शहीद झाले तर १८ जवान गंभीर जखमी झाले होते. स्फोटामुळे परिसरातील पाच गावे प्रभावित झाली असून सर्वेक्षणामध्ये ११४ रुग्णांच्या स्मृतीवर परिणाम झाल्याची बाब पूढे आली. पाहता -पाहता एक वर्षाचा कालावधी निघून गेला. घटनेनंतर काही दिवस शासकीय प्रशासन, नेते, प्रणेते यांची वारी झाली. आवश्वासनाच्या खैराती वाटल्या; पण अग्निस्फोटातील शहीद परिवाराच्या वेदना मात्र आजही कायम आहेत. शहरातील शहीद बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, प्रमोद मेश्राम व अमोल येसनकर या परिवारातील कमवता माणूस शहीद झाल्यानंतर त्या परिवाराकडे केंद्र व राज्य प्रशासनाकडून एक वर्षाच्या कालावधीत लक्ष देण्यात आले नाही. मदत तर सोडाच साधी विचारणाही झाली नसल्याची व्यथा परिवाराकडून कथन केली जाते. घटनेनंतर शहीद कुटुंबियांचे सांत्वन करताना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शहीद कुटुंबियांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी मिळावी म्हणून मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री यांना पत्र पाठवून स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. इतकेच नव्हे तर शहीद कुटुंबियांच्या सर्व परिवाराच्या समस्या लिहून घेवून व वर्धा येथे येताच या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती. घटनेनंतर पालकमंत्री वर्धा येथे अनेकदा येऊन गेलेत; पण त्यांना या शहीद कुटुंबियांना दिलेल्या शब्दाचा विसर पडल्याची खंत शहीद कुटुंबियांनी व्यक्त केली. हिंदुस्थान कॉलनीस्थित शहीद बाळू पाखरे यांच्या घरी भेट दिली असता वीरपत्नी जिजाबाई बेरोजगार मुलगा, म्हातारी आई, दोन नातू भावासह ६ जणांचा परिवार आहे. जिजाबाई उदास व चिंतीत मुद्रेने आपली व कुटुंबाची व्यथा सांगत होत्या. कमविता एकुलता माणूस गेल्याचे दु:ख उरात दडवून कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण आहे. घरात नोकरीच्या शोधात असणारा सुशिक्षित बेरोजगार मुलगा, म्हाताऱ्या सासूसह ६ व्यक्तीच्या पालन-पोषणाची जबाबदारी कशीबशी सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेपासून नोकरीत मिळणारी ग्रज्युएटी सोडली तर वर्षभरात शासनाकडून कुठलीही मदत नाही. साधे सेवानिवृत्ती वेतनही सुरू करण्यात आले नाही. अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात आली नाही. कुण्या अधिकाऱ्यांनी एक वर्षात साधी विचारणाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शहिदांच्या कुटुंबीयाची अशीच आबाळ होत असून कुणालाही वर्षभरात निवृत्तीवेतनाचा लाभ मिळालेला नाही. ३१ मे २०१६ च्या अग्निस्फोटात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिक अधिकाऱ्यांना शहीद घोषित करून त्यांना सर्व योजनेचा लाभ दिला जातो; पण त्याच घटनेत वीरमरण प्राप्त झालेले असताना अद्याप शासनाने त्यांना शहीदही घोषित केले नाही. असा भेद भाव काय, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.