शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शहरातील विकासाची वाटचाल मंदगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. अमृत आणि भूमिगत योजनेमुळे तर संपूर्ण शहरच बकाल झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांची वहिवाट ठप्प झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार बिनधास्त : जिल्हा प्रशासनाच्या डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटूनही शहरातील सर्वच विकासकामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि जिल्हा प्रशासनाच्या डुलक्या याला कारणीभूत असून यामुळे नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. अमृत आणि भूमिगत योजनेमुळे तर संपूर्ण शहरच बकाल झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांची वहिवाट ठप्प झाल्याचे चित्र आहे. भूमिगत गटार आणि अमृत योजनेकरिता सुस्थितीत रस्त्यांचे युद्धस्तरावर फोडकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी फार मोठ्या कालावधीपासून केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आले असून रहदारीकरिता जीवघेणे ठरत आहेत. दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंत रस्त्यानचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले. मात्र, धंतोलीपर्यंतच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाची मुदतदेखील संपुष्टात आली आहे.तर आर्वी मार्गालगत वर्षभरापासून नालीचे धिम्यागतीने काम सुरू असून झालेले बांधकाम पूर्णत: सदोष आहे. महत्त्वपूर्ण आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलालादेखील संथपणाचे ग्रहण लागले आहे. शहराच्या वैभववात भर घालणाऱ्या, इतिहासाची साक्ष देणाºया छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरणही अर्धवटच आहे. नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे कामही चार वर्षांपासून कासवगतीने होत आहे. अनेक ठिकाणी पथदिव्यांची उभारणी झाली; मात्र, दिवे अद्या सुरू झालेले नाहीत. तर वाहतूक नियंत्रक दिवेही दोन वर्षांपासून डोळे मिटून आहते. ही यंत्रणादेखील अद्याप कार्यान्वित झालेली नाही. विकासकामांची अशी कासवगतीने वाटचाल सुरू असताना देखरेखीची जबाबदारी असलेली यंत्रणा काय करीत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. संथगतीने होत असलेल्या कामांचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने विकासकामांचा आढावा घेत गती देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.‘त्या’ रस्त्याची चौकशी नाहीचछत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे बांधकाम पूर्णत: सदोष झालेले आहे. रस्ता बांधकामापूर्वी भूमिगत गटार योजनेचे चेंबर तयार करण्यात आले. मात्र, रस्ता बांधकाम चेंबरला समांतर करण्यात आले नाही. परिणामी रस्त्यावर चेंबर कुठे खाली तर कुठे वर आलेले असून अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहे. या रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.विकासाला ब्रेक तर लागणार नाही..!राज्यात सत्तापरिवर्तन होताच तत्कालीन भाजप सरकारने हाती घेतलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिली जात असून घेतलेले निर्णयही रद्द केले जात आहेत. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे आहेत. ही विकासकामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने यांनाही ब्रेक तर लागणार नाही ना, अशी चर्चा वर्धेकर नागरिकांत सुरू आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा