शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सेलू, समुद्रपूर व कारंजात अतिवृष्टी

By admin | Updated: June 28, 2017 00:49 IST

जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. यात सकाळपर्यंत जिल्ह्यात ५५.५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. यात सकाळपर्यंत जिल्ह्यात ५५.५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात कारंजा आणि सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर सकाळपासून कायम असताना समुद्रपूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. येथे दुपारपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत सुरू असलेल्या पावसात शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे. समुद्रपूर तालुक्यात काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. तर अल्लीपूर येथे घराची भिंत पडल्याने बैलबंडीचे नुकसान झाले आहे. गत आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात पाऊसधारा कोसळताच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. या पावसाने शेतात असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. पावसाच्या दडीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यांनी पाऊस येताच पेरणीच्या कामांना प्रारंभ केल्याचे जिल्ह्यात दिसून आले. समुद्रपूर तालुक्यात ५१ घरांचे अंशत: नुकसान समुद्रपूर तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला. यात दुपारपर्यंत तालुक्यात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही ५१ घरांचे अंशत: नुकसान झाले. याचा फटका एकूण १६९ व्यक्तींना बसला असून तसा अहवाल तहसीलदारांनी तयार केला आहे.