शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सेलू, समुद्रपूर व कारंजात अतिवृष्टी

By admin | Updated: June 28, 2017 00:49 IST

जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. यात सकाळपर्यंत जिल्ह्यात ५५.५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. यात सकाळपर्यंत जिल्ह्यात ५५.५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात कारंजा आणि सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर सकाळपासून कायम असताना समुद्रपूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. येथे दुपारपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत सुरू असलेल्या पावसात शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे. समुद्रपूर तालुक्यात काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. तर अल्लीपूर येथे घराची भिंत पडल्याने बैलबंडीचे नुकसान झाले आहे. गत आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात पाऊसधारा कोसळताच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. या पावसाने शेतात असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. पावसाच्या दडीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यांनी पाऊस येताच पेरणीच्या कामांना प्रारंभ केल्याचे जिल्ह्यात दिसून आले. समुद्रपूर तालुक्यात ५१ घरांचे अंशत: नुकसान समुद्रपूर तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला. यात दुपारपर्यंत तालुक्यात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही ५१ घरांचे अंशत: नुकसान झाले. याचा फटका एकूण १६९ व्यक्तींना बसला असून तसा अहवाल तहसीलदारांनी तयार केला आहे.