शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बिकट परिस्थितीवर मात करून ‘त्यांनी’ फुलविली शेती

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने

वर्धा : अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने केवळ जिद्दीने शेती फुलविली. ही शेती अन्य शेतकऱ्यांच्या मनात नवा अंकूर फुलविणारी आहे.उत्तम झाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा तालुक्यातील वाठोडा शिवारात त्यांची १५ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन भाऊ आहे. मधला किसराज इंजिनिअर आहे. लहान्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. कापूस आणि सोयाबीन हेच त्यांचे मुख्य पीक. शेती पिकत नव्हती. शेती परवडेनासी झाली. बियाणे व रासायनिक खतांचा खर्चही झेपत नव्हता. अनेक अविचार डोक्यात आले. मात्र आत्महत्या करायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला. दोन्ही भावंडांनीही नोकरीच्या मागे न धावता शेतात राबण्याचा निर्णय घेतला. या तिघांही पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कपाशीचे पीक घेणे बंद केले. सोयाबीनचे पीक नगदी असल्यामुळे ते अजूनही घेत आहे. त्याशिवाय तूर, भाजीपाला, मिरची, वांगे, गहू व इतरही पीक घ्यायला सुरूवात केली. शेतात रासायनिक खतांचा वापरही कायम बंद केला. सोयाबीनचे पीकसुद्धा ते शेणखत टाकून घेतात. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. शेतात हे तिघे भावंडे तर राबतातच, शिवाय त्यांच्या बायकाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेती व्यवसाय करण्यासाठी मदत करीत आहे. दररोज भाजीपाल्याच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तर इतर पीक वार्षिक उत्पन्नात भर घालत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)