शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बिकट परिस्थितीवर मात करून ‘त्यांनी’ फुलविली शेती

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने

वर्धा : अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने केवळ जिद्दीने शेती फुलविली. ही शेती अन्य शेतकऱ्यांच्या मनात नवा अंकूर फुलविणारी आहे.उत्तम झाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा तालुक्यातील वाठोडा शिवारात त्यांची १५ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन भाऊ आहे. मधला किसराज इंजिनिअर आहे. लहान्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. कापूस आणि सोयाबीन हेच त्यांचे मुख्य पीक. शेती पिकत नव्हती. शेती परवडेनासी झाली. बियाणे व रासायनिक खतांचा खर्चही झेपत नव्हता. अनेक अविचार डोक्यात आले. मात्र आत्महत्या करायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला. दोन्ही भावंडांनीही नोकरीच्या मागे न धावता शेतात राबण्याचा निर्णय घेतला. या तिघांही पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कपाशीचे पीक घेणे बंद केले. सोयाबीनचे पीक नगदी असल्यामुळे ते अजूनही घेत आहे. त्याशिवाय तूर, भाजीपाला, मिरची, वांगे, गहू व इतरही पीक घ्यायला सुरूवात केली. शेतात रासायनिक खतांचा वापरही कायम बंद केला. सोयाबीनचे पीकसुद्धा ते शेणखत टाकून घेतात. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. शेतात हे तिघे भावंडे तर राबतातच, शिवाय त्यांच्या बायकाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेती व्यवसाय करण्यासाठी मदत करीत आहे. दररोज भाजीपाल्याच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तर इतर पीक वार्षिक उत्पन्नात भर घालत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)