शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बिकट परिस्थितीवर मात करून ‘त्यांनी’ फुलविली शेती

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने

वर्धा : अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने केवळ जिद्दीने शेती फुलविली. ही शेती अन्य शेतकऱ्यांच्या मनात नवा अंकूर फुलविणारी आहे.उत्तम झाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा तालुक्यातील वाठोडा शिवारात त्यांची १५ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन भाऊ आहे. मधला किसराज इंजिनिअर आहे. लहान्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. कापूस आणि सोयाबीन हेच त्यांचे मुख्य पीक. शेती पिकत नव्हती. शेती परवडेनासी झाली. बियाणे व रासायनिक खतांचा खर्चही झेपत नव्हता. अनेक अविचार डोक्यात आले. मात्र आत्महत्या करायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला. दोन्ही भावंडांनीही नोकरीच्या मागे न धावता शेतात राबण्याचा निर्णय घेतला. या तिघांही पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कपाशीचे पीक घेणे बंद केले. सोयाबीनचे पीक नगदी असल्यामुळे ते अजूनही घेत आहे. त्याशिवाय तूर, भाजीपाला, मिरची, वांगे, गहू व इतरही पीक घ्यायला सुरूवात केली. शेतात रासायनिक खतांचा वापरही कायम बंद केला. सोयाबीनचे पीकसुद्धा ते शेणखत टाकून घेतात. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. शेतात हे तिघे भावंडे तर राबतातच, शिवाय त्यांच्या बायकाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेती व्यवसाय करण्यासाठी मदत करीत आहे. दररोज भाजीपाल्याच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तर इतर पीक वार्षिक उत्पन्नात भर घालत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)