शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:27 IST

तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदेवळी तालुक्यातील मलातपूर येथील घटना

वर्धा : तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. अशातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवळी तालुक्यातील मलातपूर येथे घडली असून, यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी सागर पजगाडे यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. त्यांनी मलातपूर येथे आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. त्यासाठी त्यांनी बँकचे १५ लाखांचे कर्जही घेतले आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय जोमात येत नाहीच तो महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला. तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सागर पजगाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

असे ठेवले जायचे तापमानावर नियंत्रण

पोल्ट्री फार्मचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्सझॉस्ट फॅन आणि दोन मोठे कूलर लावले आहेत. सोबतच आवश्यक ठिकाणी वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जायचे; परंतु महावितरणकडून खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तब्बल पाच तास सुरळीत न करण्यात आल्याने हे सर्व बंद होते. अशातच पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्या.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्राथमिकदृष्ट्या उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवळी पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwardha-acवर्धा