शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:27 IST

तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदेवळी तालुक्यातील मलातपूर येथील घटना

वर्धा : तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. अशातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवळी तालुक्यातील मलातपूर येथे घडली असून, यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी सागर पजगाडे यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. त्यांनी मलातपूर येथे आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. त्यासाठी त्यांनी बँकचे १५ लाखांचे कर्जही घेतले आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय जोमात येत नाहीच तो महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला. तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सागर पजगाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

असे ठेवले जायचे तापमानावर नियंत्रण

पोल्ट्री फार्मचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्सझॉस्ट फॅन आणि दोन मोठे कूलर लावले आहेत. सोबतच आवश्यक ठिकाणी वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जायचे; परंतु महावितरणकडून खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तब्बल पाच तास सुरळीत न करण्यात आल्याने हे सर्व बंद होते. अशातच पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्या.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्राथमिकदृष्ट्या उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवळी पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwardha-acवर्धा