शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

उन्नत शेतीतून ६,३९० शेतकरी समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:22 IST

शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे.

१,५६० हेक्टरवर विकसित तंत्रज्ञानाने शेती : बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना शेतीचा अनुभव आहे; पण त्यांच्याकडून होत असलेली शेती ही पारंपरिक पद्धतीचीे आहे. यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची हमी कमी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे. शेती शेतकऱ्यांची, तंत्रासह बियाणे आमचे; पण उत्पन्न तुमचे असे म्हणत शासनाने राज्यात हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना लागवड व पेरणीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे. या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ प्रशिक्षण देत असून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १ हजार ५६० हेक्टरवर विकसित तंत्राने शेती सुरू आहे. या अभियानात शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेल्या बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचें उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडूनच दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयोग होत आहे. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कंपनीचे बियाणे देण्यात आले आहे. या बियाण्यावर काही शेतकऱ्यांनी अविश्वास दर्शविल्याने त्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. याची रक्कम शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.