शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाच्या देयकांची थकबाकी ८३.८५ कोटींवर

By admin | Updated: June 9, 2017 01:58 IST

संतप्त शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अख्खे राज्य ढवळून निघाले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत असून

६३ हजार ५४ शेतकरी : नवे ३,२४९ शेतकरी प्रतीक्षा यादीत रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संतप्त शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अख्खे राज्य ढवळून निघाले आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत असून त्यांना आधार देण्याकरिता कर्जमाफीसह कृषी पंपाच्या देयकाची थकबाकी माफ करण्याची मागणी झाली. वर्धेतील तब्बल ६३ हजार ५४ शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे कृषी पंपाच्या देयकाचा भरणा केला नसल्याने त्याची थकबाकी ८३.८५ कोटींवर पोहोचली आहे. ही रक्कम माफ झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील एक मोठे कर्ज कमी होणार आहे. विदर्भातील कोरडवाहू भाग सिंचनाखाली आणण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप देण्यात आले. या योजनेत कृषी पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या वापराअंती वीजभार अदा करणे अनिवार्य आहे. या कृषी पंप देयकाच्या थकबाकीचा भरणा करण्याकरिता महावितरणच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहेत; पण या योजनाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अडचणीची ठरत आहे. सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना येत असलेले देयक भरणे कठीण जात असल्याने त्यांच्याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक असलेला शेतकऱ्यांचा वाटा भरणे कठीण जात असल्याने या योजनेकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी वर्धेत १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून सिंचन सुरू केले आहे. थकबाकी शंभर कोटी रुपयांवर जात असताना वर्धेत कृषी पंपाची मागणी वाढतच असल्याचे दिसून आले आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ३ हजार २४९ शेतकरी कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत ४ हजार ८६९ शेतकऱ्यांना जोडण्या मिळाल्या आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानावर जोडण्या देण्यात येत असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात १०९ शेतकऱ्यांकडून सौर सिंचनशेतकऱ्यांवर वीज देयकाचा भुर्दंड बसू नये याकरिता शासनाच्यावतीने अनुदानावर सौर कृषी पंप देण्याची योजना आखण्यात आली; पण यात अश्वशक्तीनुसार भरावी लागणारी रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी नाही, असे म्हणत शेतकरी या योजनेला पाठ दाखवित आहे. जिल्ह्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक रक्कम महावितरणकडे भरली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू आहे. असे असले तरी प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्यापही दूरच असल्याचे दिसून येत आहे.कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास हा आकडा नक्कीच कमी होईल. थकबाकी असलेल्या जोडण्यासंदर्भातील कुठल्याही नव्या निर्णयाची माहिती नाही.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.