शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बाहेरचे बेपत्ता, आतल्यांवर मात्र मेहरनजर

By admin | Updated: June 27, 2015 02:44 IST

विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे

वर्धा : विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याचा भंडाफोड ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून करताच लक्ष इमारतीच्या आवारात असलेले दलाल बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले; मात्र इमारतीच्या आत असलेले दलाल कायमच होते. या दलालांवर प्रशासनाची मेहरनजर असल्याची चर्चा विविधा केंद्राच्या आवारात सुरू होती. दहावी-बारावीचे निकाल लागताच उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्राची गरज भासते. ती पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांची विविधा केंद्रात आॅनलाईन अर्ज करण्याकरिता गर्दी वाढली आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून तर त्याचे प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंतचा अलिखीत करार करण्याची पद्धत येथे रूढ झाली आहे. ही बाब ‘लोकमत’ने प्रशासनाच्या नजरेत आणून दिली. यावर कारवाईच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कॅमऱ्यात अद्याप एकही दलाल गवसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कॅमेऱ्यासमक्षच हा प्रकार सुरू असताना तो कॅमेऱ्यात कैद होणे क्रमप्राप्त आहे. असे असताना यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मग कॅमेऱ्यांची उठाठेव कशाकरिता, असा प्रश्न समोर येत आहे. केंद्रात सुरू असलेल्या या दलालांना प्रशासनातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने आपले काहीच बिघडत नाही, अशा अर्विभावात दलाल वागत आहे. यामुळेच कॅमेऱ्यासमोर टेबल लावून ते बसत आहेत. येथे येणाऱ्यांना थेट काय पाहिजे, याची विचारणा त्यांच्याकडून आहे. या कारणाने इमारतीच्या आत असलेले दलाल कायम आहे. ‘लोकमत’चे वृत्त झळकताच इमारतीच्या आवारातील दलालांनी पलायन केले. आतील दलाल हे येथील अधिकाऱ्यांशी असलेल्या आर्थिकसंबंधामुळे कायम आहेत, असेही बोलले जात आहे.(प्रतिनिधी)