शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

शंभरावर परीक्षार्थी केंद्राबाहेर

By admin | Updated: March 30, 2015 01:45 IST

पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना ...

वर्धा : पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. परीक्षेच्या हॉल तिकिटासह इतर दुसरे ओळखपत्र नसल्याने या परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्यापासून मज्जाव करण्यात आला. परीक्षा देण्याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकाला विनंती केली असता त्यांनी ती धुडकावून लावली. केंद्र शासनाच्या पोस्ट विभागात पोस्टमन या जागेकरिता रविवारी परीक्षा होती. यात जिल्ह्यातीलच नाही तर इतर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरला. यामुळे आॅनलाईनच हॉल तिकीट आली. परीक्षा देण्याकरिता हॉल तिकीट तर महत्त्वाचे आहेच शिवाय या हॉल तिकिटावर दुसरे एखादे ओळखपत्र आणण्याच्या सूचना नसमूद करण्यात आल्या होत्या. ठरलेल्या या पदाकरिता यानुसार रविवारी परीक्षा होती. वर्धेतील विविध महाविद्यालय या परीक्षेकरिता केंद्र देण्यात आले होते. यात सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय एक केंद्र होते. दुपारी ३ वाजता परीक्षा असल्याने काही काळपूर्वीच परीक्षार्थी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना खोलीत बसविण्यात आले. यावेळी ओळखपत्रासह दुसरे एखादे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केंद्रावर करण्यात आली. यावेळी परीक्षार्थ्यांनी याच ओळखपत्रावर परीक्षेला उपस्थित राहू देण्याची मागणी केली. मात्र ज्यांच्याकडे दुसरे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला. इतर परीक्षा केंद्राचर मात्र असा प्रकार झाला नसल्याची ओरड यावेळी करण्यात आली. शिवाय काही परीक्षार्थ्यांना परीक्षेदरम्यान हॉल तिकीट तपासून अर्धा पेपर सोडविल्यानंतर बाहेर काढण्यात आले. त्यांना तुम्ही जेवढा पेपर सोडविला तेवढा जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर संतापलेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला परीक्षेला उपस्थित राहण्याची विनवणी केंद्राच्या पर्यवेक्षकाला केली. त्यांना इतर केंद्रावर असे नसल्याचे सांंगितले; मात्र त्यांनी यावर थेट नकार दिल्याने विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. पेपर संपताच पेपर फुटल्याची चर्चा जोरात झाली. याच परीक्षा केंद्रावर असलेल्या एका युवकाच्या मोबाईलवर एका प्रश्नाचे उत्तर वॉट्स अ‍ॅपवर आल्याची चर्चा जोरात असून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी होत होती. (प्रतिनिधी)