शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आठपैकी तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:33 IST

देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्देतळणी (भागवत ) येथील घटना : वन विभागाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या घटत असून ही बाब चिंतेची असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन वन विभागाकडून केले जाते. परंतु, आज तळणी शिवारात पाच रोह्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने वन विभागाचे दुर्लक्षित धोरण चव्हाट्यावरच आल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील तळणी भागवत शिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याचे शेतकºयांच्या लक्षात येताच त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, परडखे, शेख यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने विहिरीत पडलेल्या रोह्यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माहिती मिळताच झटपट वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठणे गरजेचे असताना ते उशीराने पोहोल्याची चर्चा परिसरात होत होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी सायंकाळी उशीरापर्यंत एकूण तीन रोह्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. तर पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे. वृत्तलिहिस्तोवर सदर विहिरीत आणखी काही रोही तर नाही ना, याची शहानिशा वनविभागाच्या अधिकाºयांकडून केली जात होती.तळणी भागवत शेत शिवारातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये तीन रोह्यांना सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.