शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठपैकी तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:33 IST

देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्देतळणी (भागवत ) येथील घटना : वन विभागाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या घटत असून ही बाब चिंतेची असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन वन विभागाकडून केले जाते. परंतु, आज तळणी शिवारात पाच रोह्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने वन विभागाचे दुर्लक्षित धोरण चव्हाट्यावरच आल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील तळणी भागवत शिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याचे शेतकºयांच्या लक्षात येताच त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, परडखे, शेख यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने विहिरीत पडलेल्या रोह्यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माहिती मिळताच झटपट वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठणे गरजेचे असताना ते उशीराने पोहोल्याची चर्चा परिसरात होत होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी सायंकाळी उशीरापर्यंत एकूण तीन रोह्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. तर पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे. वृत्तलिहिस्तोवर सदर विहिरीत आणखी काही रोही तर नाही ना, याची शहानिशा वनविभागाच्या अधिकाºयांकडून केली जात होती.तळणी भागवत शेत शिवारातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये तीन रोह्यांना सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.