शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आठपैकी तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:33 IST

देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

ठळक मुद्देतळणी (भागवत ) येथील घटना : वन विभागाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या घटत असून ही बाब चिंतेची असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन वन विभागाकडून केले जाते. परंतु, आज तळणी शिवारात पाच रोह्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने वन विभागाचे दुर्लक्षित धोरण चव्हाट्यावरच आल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील तळणी भागवत शिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याचे शेतकºयांच्या लक्षात येताच त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, परडखे, शेख यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने विहिरीत पडलेल्या रोह्यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माहिती मिळताच झटपट वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठणे गरजेचे असताना ते उशीराने पोहोल्याची चर्चा परिसरात होत होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी सायंकाळी उशीरापर्यंत एकूण तीन रोह्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. तर पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे. वृत्तलिहिस्तोवर सदर विहिरीत आणखी काही रोही तर नाही ना, याची शहानिशा वनविभागाच्या अधिकाºयांकडून केली जात होती.तळणी भागवत शेत शिवारातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये तीन रोह्यांना सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.