शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

1,387 पैकी 1,338 गावांची पैसेवारी 51 पैशांहून अधिकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावे खरीप पिकाखाली असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी आली. इतकेच नव्हे तर प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे आणि लागवड योग्य नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून यात तब्बल १ हजार ३३८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैशांहून अधिक असल्याचे नमूद केले आहे.वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.   आर्वी तालुक्यातील ३४ गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर १७३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. आष्टी तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशांत असून कारंजा तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर २० गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये  असल्याचे  सांगण्यात   आले. 

६१ ते ७० पैशात तब्बल ९५० गावांची पैसेवारी

-  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून ५१ ते ६० मध्ये १७१, ६१ ते ७० मध्ये ९५०, ७१ ते ८० मध्ये १४१ तर ८१ ते ९० मध्ये ७६ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातीची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्यांना शासनाकडून विविध योजनांचा विशेष लाभ दिला जातो.

हवालदिल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा-   यंदाच्या वर्षी अनेक सोयाबीन उत्पादकांना समाधानकारक उत्पन्न झाले असले तरी जिल्ह्यातील काही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकीच आली आहे. तर यंदा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी पिकांसाठी तयार होतेय शेत जमीनसेलू तालुक्यातील अनेक शेतकरी कपाशी उपटून रब्बी चणा किंवा गहू पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहे. तर काही हवालदिल शेतकरी खरीप हंगामातील नुकसान भरून काढता यावे या हेतूने रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करीत आहेत. 

विशेष अनुदानापासून राहावे लागेल वंचित-    ज्या जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्याला तसेच त्या तालुक्याला शासनाकडून विशेष अनुदान जाहीर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. पण यंदा वर्धा जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक असल्याने शासनाच्या विशेष अनुदानापासून वर्धा जिल्ह्याला वंचितच राहावे लागणार आहे.