शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

1,387 पैकी 1,338 गावांची पैसेवारी 51 पैशांहून अधिकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावे खरीप पिकाखाली असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी आली. इतकेच नव्हे तर प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे आणि लागवड योग्य नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून यात तब्बल १ हजार ३३८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैशांहून अधिक असल्याचे नमूद केले आहे.वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.   आर्वी तालुक्यातील ३४ गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर १७३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. आष्टी तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशांत असून कारंजा तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर २० गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये  असल्याचे  सांगण्यात   आले. 

६१ ते ७० पैशात तब्बल ९५० गावांची पैसेवारी

-  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून ५१ ते ६० मध्ये १७१, ६१ ते ७० मध्ये ९५०, ७१ ते ८० मध्ये १४१ तर ८१ ते ९० मध्ये ७६ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातीची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्यांना शासनाकडून विविध योजनांचा विशेष लाभ दिला जातो.

हवालदिल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा-   यंदाच्या वर्षी अनेक सोयाबीन उत्पादकांना समाधानकारक उत्पन्न झाले असले तरी जिल्ह्यातील काही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकीच आली आहे. तर यंदा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी पिकांसाठी तयार होतेय शेत जमीनसेलू तालुक्यातील अनेक शेतकरी कपाशी उपटून रब्बी चणा किंवा गहू पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहे. तर काही हवालदिल शेतकरी खरीप हंगामातील नुकसान भरून काढता यावे या हेतूने रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करीत आहेत. 

विशेष अनुदानापासून राहावे लागेल वंचित-    ज्या जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्याला तसेच त्या तालुक्याला शासनाकडून विशेष अनुदान जाहीर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. पण यंदा वर्धा जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक असल्याने शासनाच्या विशेष अनुदानापासून वर्धा जिल्ह्याला वंचितच राहावे लागणार आहे.