शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुसऱ्यांच्या मरणावर चालतो आमचा संसार

By admin | Updated: February 7, 2015 23:28 IST

पोटासाठी काहीतरी करावच लागतं. आमचं पोट मात्र इतरांच्या मरणावर चालतं. रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या तिरडीच्या बांबूचाच आधार घेत ८५ वर्षांचे दादाजी मसराम आपली व्यथा सांगतात.

पराग मगर - वर्धापोटासाठी काहीतरी करावच लागतं. आमचं पोट मात्र इतरांच्या मरणावर चालतं. रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या तिरडीच्या बांबूचाच आधार घेत ८५ वर्षांचे दादाजी मसराम आपली व्यथा सांगतात. कुणालाही आयुष्यात येऊच नये अशी वाटणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. पण तेच जगातील अंतिम सत्य असल्याने त्यापासून कुणाचीही सुटका नाही. माणसाच्या मरणानंतर त्याला स्मशानघाटात नेण्यासाठी तिरडीची आवश्यकता असते. कुणाच्याही घरी मय्यत झाल्यावर आधी तिरडीची गरज भासत असली तरी असा व्यवसाय करीत असलेल्यांकडे मात्र कुस्सीत नजरेने पाहिले जाते. दादाजी सांगतात की, लहानपणापासूनच घरी तिरडी बनविणे तसेच बांबूच्या टोपल्या बनविण्याचा व्यवसाय चालायला. आधी टोपल्यांना प्रचंड मागणी होती. त्यामुळे तोच मुख्य व्यवसाय होता. पण आता टोपल्या केवळ काहीच प्रसंगांना घेतल्या जातात. त्यामुळे तिरडी विकणे हाच काही वर्षांपासून मुख्य व्यवसाय झाला आहे. लोकं मरतात म्हणून आमचा व्यवसाय चालतो असं कधी कधी वाटूनही जातं, पण तीही समाजाची गरज आहे. आम्ही ती गरज भागवतो याच काहीसं समाधान असल्याचही दादाजी सांगतात.