शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

दुसऱ्यांच्या मरणावर चालतो आमचा संसार

By admin | Updated: February 7, 2015 23:28 IST

पोटासाठी काहीतरी करावच लागतं. आमचं पोट मात्र इतरांच्या मरणावर चालतं. रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या तिरडीच्या बांबूचाच आधार घेत ८५ वर्षांचे दादाजी मसराम आपली व्यथा सांगतात.

पराग मगर - वर्धापोटासाठी काहीतरी करावच लागतं. आमचं पोट मात्र इतरांच्या मरणावर चालतं. रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या तिरडीच्या बांबूचाच आधार घेत ८५ वर्षांचे दादाजी मसराम आपली व्यथा सांगतात. कुणालाही आयुष्यात येऊच नये अशी वाटणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. पण तेच जगातील अंतिम सत्य असल्याने त्यापासून कुणाचीही सुटका नाही. माणसाच्या मरणानंतर त्याला स्मशानघाटात नेण्यासाठी तिरडीची आवश्यकता असते. कुणाच्याही घरी मय्यत झाल्यावर आधी तिरडीची गरज भासत असली तरी असा व्यवसाय करीत असलेल्यांकडे मात्र कुस्सीत नजरेने पाहिले जाते. दादाजी सांगतात की, लहानपणापासूनच घरी तिरडी बनविणे तसेच बांबूच्या टोपल्या बनविण्याचा व्यवसाय चालायला. आधी टोपल्यांना प्रचंड मागणी होती. त्यामुळे तोच मुख्य व्यवसाय होता. पण आता टोपल्या केवळ काहीच प्रसंगांना घेतल्या जातात. त्यामुळे तिरडी विकणे हाच काही वर्षांपासून मुख्य व्यवसाय झाला आहे. लोकं मरतात म्हणून आमचा व्यवसाय चालतो असं कधी कधी वाटूनही जातं, पण तीही समाजाची गरज आहे. आम्ही ती गरज भागवतो याच काहीसं समाधान असल्याचही दादाजी सांगतात.