शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा वर्षभरासाठी थांबविणार वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:27 IST

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून कॉन्व्हेंट वगळता पहिली ते आठवी वर्ग असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी तसेच शासनमान्य शाळांमधील विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तके देण्यात येतात.

ठळक मुद्देजि.प. शिक्षण विभागाच्या सूचना। शाळेपर्यंत पाठ्यपुस्तके न पोहोचविणे भोवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून कॉन्व्हेंट वगळता पहिली ते आठवी वर्ग असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी तसेच शासनमान्य शाळांमधील विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शिवाय ही पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविणे क्रमप्राप्त असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांना पाठ्यपुस्तके नेण्यासाठी सांगितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेपर्यंत सदर पाठ्यपुस्तक पोहोचवावे, अशा सूचना जि.प. शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिवाय या कामात हयगय करणाºया अधिकाºयाची एक वर्षासाठी वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.शासनाच्या या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी आणि शासन मान्य अशा एकूण १ हजार २८२ शाळा आहेत. पहिली ते पाचवीच्या ५४ हजार ७३८ विद्यार्थ्यांसाठी २ लाख ५७ हजार ७६९ तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ७५ हजार २१९ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. ही संपूर्ण पुस्तके प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर ती पोहोचविण्यात आली आहे. परंतु, काही गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून ही पुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्याच्या विषयाला बगल दिली जात असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे जि.प. शिक्षण विभागाकडून सदर पुस्तके प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रती टन १ हजार २०० रुपये प्रमाणे निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, काही गट शिक्षणाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना तालुक्याच्या स्थळी बोलावून ही पुस्तके तुम्ही तुमच्या खर्चाने शाळेपर्यंत न्या असे सांगितल्या जात आहे.त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर विषय लक्षात येताच जि.प.च्या शिक्षण विभागाने आता दुर्लक्षीत धोरणाचा अवलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यासाठी कंबर कसली आहे.जो अधिकारी शाळेपर्यंत पाठ्यपुस्तक पोहोचविणार नाही, अशा दोषी आढळणाºया अधिकाºयाची वेतन वाढ एक वर्षासाठी रोखून धरली जाणार आहे. त्या दिशेने सध्या कार्यवाहीही केली जात असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटत आहे. परंतु, अद्यापही काही शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. मात्र, मुख्याध्यापकांनाच तालुक्याच्या स्थळी बोलावून पुस्तके नेण्याचे सांगितल्या जाते. यामुळे शिक्षकांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने योग्य कार्यवाही करावी.- अजय भोयर, कार्यालय मंत्री, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभाग.मोफत पाठ्यपुस्तक योजनेत पात्र ठरणाऱ्या शाळांपर्यंत पुस्तके अधिकाऱ्यांनी पोहोचवावी. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जो अधिकारी या सूचनेकडे दुर्लक्ष करेल. शिवाय त्याच्याविरुद्ध अशी कुठली तक्रार येईल, त्याची चौकशी करून दोषी ठरणाºया अधिकाऱ्याची एक वर्षपर्यंत वेतन वाढ थांबविण्याची कार्यवाही केली जाईल.- वाल्मिक इंगोले, उपशिक्षणाधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र