शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:53 IST

धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली.

ठळक मुद्देधनगर समाज आरक्षण : नागपूर अधिवेशनात हल्लाबोल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. सत्तेत आल्यावर आरक्षण देऊ, असे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. आज सत्ता येऊन तीन वर्षे झाली; पण अंमल केला नाही. यामुळे एक-दीड महिन्यात अनु. जमातीच्या सवलती मिळाल्या नाही तर लबाड मुख्यमंत्र्यांना धनगर समाज धडा शिकवेल, असा इशारा माजी आमदार तथा भारिप बहुजन महासंघ अकोल्याचे हरिभाऊ भदे यांनी पत्रपरिषदेतून दिला.धनगर समाजाला अनु. जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याच्या मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा आयोजित आहे. याबाबत माहिती देण्याकरिता शुक्रवारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आहे. याबाबत सबळ पुरावे आहेत; पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. हे उपोषण फडणवीस यांनी सोडविले. तेव्हा धनगर समाजाने एक गठ्ठा मते आम्हाला द्यावी, आमचे सरकार सत्तेवर आल्यास धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत धनगर समाज मागासलेला आहे. धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आवश्यक आहे. केंद्रात सरकार आल्यास आदेश काढू, अशी ग्वाही दिली होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर येथे ४ जानेवारी २०१५ रोजी धनगर समाजाने त्यांचा सत्कार केला. त्यावेळीही फडणवीस यांनी धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो. मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या अनु. जमातीच्या आरक्षणाचा ठराव पारित करतो. केंद्र सरकारकडे पाठवितो, असे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या शेकडो बैठका झाल्या; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपा सरकारवर राग व्यक्त करण्यासाठी तथा सत्तेतून बाहेर करण्यासाठी नागपूर विधी मंडळाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे.धनगर समाजाच्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. शासकीय सेवेत असणाºया धनगर समाजाच्या कर्मचाºयांची सेवा बढती थांबविली. मेंढपाळासाठी संरक्षित चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे. अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाद्वारे १०० टक्के अनुदानावर केवळ धनगर समाजाला शेळी-मेंढी उद्योगासाठी तरतूद करावी. धनगर समाजाला वनविभागाने सरंक्षण देणारा कायदा पारित करावा आदी मागण्या मोर्चातून लावून धरण्यात येणार असल्याचेही सांगितले. यशवंत स्टेडीयम नागपूर येथून मोर्चाची सरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी धनगर समाज युवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष पुरूषोत्तम डाखोळे नागपूर, राजू गोरडे वर्धा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.