शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:53 IST

धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली.

ठळक मुद्देधनगर समाज आरक्षण : नागपूर अधिवेशनात हल्लाबोल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. सत्तेत आल्यावर आरक्षण देऊ, असे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. आज सत्ता येऊन तीन वर्षे झाली; पण अंमल केला नाही. यामुळे एक-दीड महिन्यात अनु. जमातीच्या सवलती मिळाल्या नाही तर लबाड मुख्यमंत्र्यांना धनगर समाज धडा शिकवेल, असा इशारा माजी आमदार तथा भारिप बहुजन महासंघ अकोल्याचे हरिभाऊ भदे यांनी पत्रपरिषदेतून दिला.धनगर समाजाला अनु. जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याच्या मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा आयोजित आहे. याबाबत माहिती देण्याकरिता शुक्रवारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आहे. याबाबत सबळ पुरावे आहेत; पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. हे उपोषण फडणवीस यांनी सोडविले. तेव्हा धनगर समाजाने एक गठ्ठा मते आम्हाला द्यावी, आमचे सरकार सत्तेवर आल्यास धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत धनगर समाज मागासलेला आहे. धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आवश्यक आहे. केंद्रात सरकार आल्यास आदेश काढू, अशी ग्वाही दिली होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर येथे ४ जानेवारी २०१५ रोजी धनगर समाजाने त्यांचा सत्कार केला. त्यावेळीही फडणवीस यांनी धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो. मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या अनु. जमातीच्या आरक्षणाचा ठराव पारित करतो. केंद्र सरकारकडे पाठवितो, असे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या शेकडो बैठका झाल्या; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपा सरकारवर राग व्यक्त करण्यासाठी तथा सत्तेतून बाहेर करण्यासाठी नागपूर विधी मंडळाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे.धनगर समाजाच्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. शासकीय सेवेत असणाºया धनगर समाजाच्या कर्मचाºयांची सेवा बढती थांबविली. मेंढपाळासाठी संरक्षित चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे. अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाद्वारे १०० टक्के अनुदानावर केवळ धनगर समाजाला शेळी-मेंढी उद्योगासाठी तरतूद करावी. धनगर समाजाला वनविभागाने सरंक्षण देणारा कायदा पारित करावा आदी मागण्या मोर्चातून लावून धरण्यात येणार असल्याचेही सांगितले. यशवंत स्टेडीयम नागपूर येथून मोर्चाची सरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी धनगर समाज युवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष पुरूषोत्तम डाखोळे नागपूर, राजू गोरडे वर्धा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.