शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील पाचोडमधील सेंद्रिय फळ, भाजीपाल्याला मुंबईकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 14:33 IST

Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

ठळक मुद्देवाढीव दराने होतेय विक्री, गावातून ट्रक झाला रवाना

सचिन देवतळेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण, आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा होत आहे. नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

आर्वी तालुक्याच्या विरुळ (आकाजी) नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीअंतर्गत इको फार्म, यवतमाळ या संस्थेच्या तसेच आर्वी व कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनअंतर्गत वाडी कार्यक्रम व नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली. या शेतातून निघालेला आवळा, लिंबू, पपई व संत्री आदी फळे व भाजीपाला गावातून थेट मुंबईच्या मॉलमध्ये पाठविण्यात आला आहे. फळ व भाजीपाला भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना करताना पाचोडचे सरपंच गजानन दोरजे, टेंभरी (परसोडी) येथील सरपंच सुरेखा पांढरे व गावातील शेतकरी उपस्थित होते.दारातून केली शेतमालाची उचलपाचोड येथील ५०० किलो आवळा, ५०० किलो लिंबू, ६५० किलो पपई व ६५० किलो संत्री आदी सेंद्रियशेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली. या शेतमालाचे क्लिनिंग व ग्रेडिंग करून मुंबईला पाठविण्यात आले. हे फळ व भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खचार्ची बचत होऊन चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती