शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्धा जिल्ह्यातील पाचोडमधील सेंद्रिय फळ, भाजीपाल्याला मुंबईकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 14:33 IST

Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

ठळक मुद्देवाढीव दराने होतेय विक्री, गावातून ट्रक झाला रवाना

सचिन देवतळेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण, आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा होत आहे. नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

आर्वी तालुक्याच्या विरुळ (आकाजी) नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीअंतर्गत इको फार्म, यवतमाळ या संस्थेच्या तसेच आर्वी व कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनअंतर्गत वाडी कार्यक्रम व नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली. या शेतातून निघालेला आवळा, लिंबू, पपई व संत्री आदी फळे व भाजीपाला गावातून थेट मुंबईच्या मॉलमध्ये पाठविण्यात आला आहे. फळ व भाजीपाला भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना करताना पाचोडचे सरपंच गजानन दोरजे, टेंभरी (परसोडी) येथील सरपंच सुरेखा पांढरे व गावातील शेतकरी उपस्थित होते.दारातून केली शेतमालाची उचलपाचोड येथील ५०० किलो आवळा, ५०० किलो लिंबू, ६५० किलो पपई व ६५० किलो संत्री आदी सेंद्रियशेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली. या शेतमालाचे क्लिनिंग व ग्रेडिंग करून मुंबईला पाठविण्यात आले. हे फळ व भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खचार्ची बचत होऊन चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती