शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील सेंद्रिय तूर विषमुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

आत्माच्या पुढाकारातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये  जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तूर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५३० एकर शेतजमिनीवर तुरीची लागवड केली होती. आत्माच्या कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात या पिकाची योग्य काळजी घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली, तर सध्या सर्व शेतकऱ्यांनी तुरीची मळणीही केली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या शासनमान्य प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून शिक्कामोर्तब

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात तब्बल अडीच लाखांहून अधिक शेतकरी असून, अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. असे असले तरी काही शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत असल्याचे वास्तव आहे. असाच काहीसा प्रयोग निवडक तूर उत्पादकांना सोबत घेऊन आत्माच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यात करण्यात आला असून, या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीचे नमुने ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, वर्ध्यातील सेंद्रिय तूर विषमुक्त असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दिला आहे.आत्माच्या पुढाकारातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये  जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तूर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५३० एकर शेतजमिनीवर तुरीची लागवड केली होती. आत्माच्या कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात या पिकाची योग्य काळजी घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली, तर सध्या सर्व शेतकऱ्यांनी तुरीची मळणीही केली आहे. याच ५३० शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीचे नमुने ठाणे येथील शासनमान्य प्रयोगशाळेत    तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच आत्माच्या प्रकल्प संचालक कार्यालयास प्राप्त झाला असून, या सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली तूर विषमुक्तच असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या तुरीला रासायनिक पद्धतीचा अवलंब करून पिकविलेल्या तुरीच्या तुलनेत जास्त भाव मिळत आहे. 

आत्मा इच्छुकांना मिळून देणार तूर डाळसेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी  तुरीची डाळ करून त्याची विक्री करतात. दलालांची कुठलीही मध्यस्थी न होऊ देता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळून देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून विषमुक्त तूर डाळ खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आत्मा तूर डाळ मिळवून देणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आत्माच्या प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात  पाठविले तुरीचे नमुनेसेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या ५३० शेतकऱ्यांच्या तुरीचे नमुने गोळा करून ते फेब्रुवारी महिन्यात ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. त्याचे अहवाल मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्राप्त झाले आहेत.

अहवालात तज्ज्ञांनी हे केले आहे नमूद रासायनिक उर्वरित अंश तपासणी अहवालात रासायनिक कीटकनाशक, तसेच तणनाशकांचे अंश शासन मान्यतेप्रमाणे परमिसिबल लेवलपेक्षा कमी आढळल्याचा अहवाल ठाण्याच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दिला आहे.

सेंद्रिय पद्धतीने ५३० शेतकऱ्यांनी पिकविलेल्या तुरीचे नमुने तपासणीसाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या रासायनिक उर्वरित अंश तपासणी अहवालात रासायनिक कीटकनाशक व तणनाशकांचे अंश शासन मान्यतेप्रमाणे परमिसिबल लेवलपेक्षा कमी असल्याचे नमूद आहे. म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली तूर ही विषमुक्त आहे.- डॉ. विद्या मानकर,  प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा.

 

टॅग्स :agricultureशेती