शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

१५ दिवसांत माहिती देण्याचे विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

By admin | Updated: July 17, 2015 02:11 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाने मनमानी खर्च केला. यंदा यातील खर्चाचा तपशील मात्र सार्वजनिक करण्यात आला नाही.

लोकसभा निवडणूक खर्चाचे प्रकरणवर्धा : लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाने मनमानी खर्च केला. यंदा यातील खर्चाचा तपशील मात्र सार्वजनिक करण्यात आला नाही. यामुळे आरटीआय कार्यकर्त्याने खर्चाबाबत माहिती मागितली; पण यात अर्धवट माहिती देण्यात आली. या प्रकरणी नागपूर विभागीय माहिती आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले होते. यावर बुधवारी नागपूर येथे झालेल्या सुनावणीत १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीत झालेला खर्च नागरिकांनाही माहिती व्हावा म्हणून आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी माहिती मागितली होती. यात निवडणुकीत कोणत्या कामाच्या निवीदा काढल्या, किती निवीदा आल्या, कुणाला कंत्राट दिले व किती खर्च झाला, कोणती स्टेशनरी खरेदी केली, त्याची निवीदा काढली असल्यास प्रत व किती खर्च झाला, निवडणुकीसाठी किती खासगी वाहने वापरली, त्यावर किती खर्च झाला, किती कर्मचारी लागले, त्यावर किती खर्च झाला, चहा, अल्पोपहार व भोजनाकरिता निविदा काढली काय, त्यावरील खर्च व कंत्राट कुणाला दिले, निवडणूक निरीक्षकांवर किती खर्च आला, निवडणूक कामांसाठी किती खर्च आला, शासकीय यंत्रणा सोडून किती खासगी व्यक्तींकडून कोणती कामे करून घेण्यात आली व त्यावर किती खर्च झाला, नामांकन अर्ज दाखल केल्यासपासून १० एप्रिलपर्यंत सर्व उमेदवारांच्या खर्चाचा तपशील, आचार संहिता भंग प्रकरणी तक्रारी, कारवाई, त्याबाबतचे पत्र, आदेशाची प्रत आदी मुद्यांचा समावेश होता. या अर्जावर माहितीच देण्यात आली नाही. यामुळे प्रथम अपिल दाखल केले; पण सुनावणीच झाली नाही. यानंतर माहिती दिली; पण ती अपूरी व अर्धवट होती. यामुळे चौबे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल दाखल केले. यावर बुधवारी सुनावणी झाली. याप्रसंगी प्रशासनाकडून नायब तहसीलदार गुजर उपस्थित होत्या. या प्रकरणी प्रशासनाला १५ दिवसांत माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेत.(कार्यालय प्रतिनिधी)