नारा पाटीजवळील अपघात : संत्रा झाला खराबकारंजा (घा.) : चंदेवाणी येथून साहेबराव घोडमारे यांच्या शेतातील १० टण संत्रा बंगळुरू येथे घेऊन जात असलेला ट्रक नारा पाटीजवळ उलटला. यात चालकासह १२ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. यात संपूर्ण संत्रा खराब झाल्याचे सांगण्यात आले.पोलीस सूत्रानुसार, ट्रक एम.एच. ०४ सी.पी. ६३२७ वरूडमार्गे बंगळुरूकडे साहेबराव घोडमारे यांच्या शेतातील संत्रा घेऊन जात होता. सायंकाळच्या सुमारास नारापाटीजवळ एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून चालकासह बारा मजूर जखमी झाले. यात रिझवान खान (३१), उमेर खान (१९), सुरेश सिलू (१८), दिनेश राजगोपाल (२२), समू बनके (३०), सुभाष सिलू (२०), अनिल बनके (१८), राजेश बनके (१५), राजेश सिलू (१८), पुन्नी सिलू (३५), रामकली नागवंशी (२५) व सुनीता उईके (३५) यांचा समावेश आहे. यातील राजेश सिलू याचा हात मोडला असून सुनीता हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सर्व जखमींवर येथील ग्रामीण रुगणालयात डॉ. भेंडे व त्यांची चमू उपचार करीत आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)
संत्र्याचा ट्रक उलटून १२ मजूर जखमी
By admin | Updated: March 3, 2016 02:07 IST