शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

संत्रा उत्पादकांना हवी शासनाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:46 IST

जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही.

ठळक मुद्दे‘झेडपी’त ठराव : स्थायी समितीत झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परिणामी, बागा उद्धवस्त होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदस्यांनी केली. त्याबाबत सर्वानुमते ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला.जि.प.च्या सभागृहात सोमवारी उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन आेंबासे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपूल जाधव, वित्त व लेखा अधिकारी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण समिती सभापती नीता गजाम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आर्वी, आष्टी व कारंजा हा संत्रा उत्पादकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात जवळपास ४ हजार हेक्टरवर संत्राच्या बागा आहे. यावर्षीच्या पाणी टंचाईत संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभागृहाचे एकमत होऊन ठराव घेण्यात आला. तसेच बोरगाव (टुमनी) ग्रामपंचायतील संगणक चालकाच्या उपोषणाचाही विषय सदस्यांनी सभागृहात मांडला. या ग्रामपंचायतीने उत्पन्न कमी असल्याने १४ व्या वित्त आयोगातून या संगणक चालकाचे ११ महिन्याचे वेतन देण्यास ग्रामापंचायत असमर्थ असल्याने हे गाव नजिकच्या वडाळा या गावासोबत जोडावे जेणे करुन उत्पन्न वाढेल आणि समस्याही निकाली निघेल, अशाही सूचना सदस्यांनी केल्या. त्यावरुन अधिकाºयांनी सहमती दर्शविल्याचेही सांगण्यात आले आहे. सोबतच इतरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावेशहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गावर भुयारी बोगदा तयार करण्यात आला असून दोन्ही बाजुने अ‍ॅप्रोच रोडवरुन वाहतूक सुरु आहे. अ‍ॅप्रोच रोड पुर्णत: उखरलेला असून वाहनांमुळे त्यावरील धूळ परिसरात पसरत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनाही श्वसनाचे आजार बळावले आहे. त्यामुळे या अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावे, यासाठी सभागृहाने ठराव घेऊन जिल्हाधिकाºयांना पाठवावा. तसेच जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी गटनेता संजय शिंदे यांनी केली.वर्कआॅर्डरला मुदतवाढ द्याअनेक विकासात्मक कामांचे वर्क आॅर्डर झाले आहे. परंतु पाण्यामुळे कामांना थांबा देण्यात आला. सोबतच वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यानेही कामे थांबली होती. आता घाटाचा लिलाव होऊन अल्पावधीतच त्यावर स्थगिती आल्याने वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे विकासात्मक कामे ठराविक वेळात कसे पुर्ण करावे, असा प्रश्न कंत्राटदांपुढे असल्यामुळे कंत्राटदारांना वाळू ऐवजी चुरी वापरण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांच्या वर्क आॅर्डलाही मुदत वाढ द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.शासकीय बांधकाम बंद कराजिल्ह्यातील पाणी समस्या लक्षात घेत नागरिकांनी बांधकाम बंद केले आहे. परंतु शासकीय बांधकाम अजुनही जोमात सुरु असल्याने त्यावर टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असताना दुसरीकडे शासकीय बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरु आहे. त्यामुळे शासकीय बांधकामेही बंद करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.