शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकांना हवी शासनाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:46 IST

जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही.

ठळक मुद्दे‘झेडपी’त ठराव : स्थायी समितीत झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परिणामी, बागा उद्धवस्त होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदस्यांनी केली. त्याबाबत सर्वानुमते ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला.जि.प.च्या सभागृहात सोमवारी उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन आेंबासे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपूल जाधव, वित्त व लेखा अधिकारी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण समिती सभापती नीता गजाम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आर्वी, आष्टी व कारंजा हा संत्रा उत्पादकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात जवळपास ४ हजार हेक्टरवर संत्राच्या बागा आहे. यावर्षीच्या पाणी टंचाईत संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभागृहाचे एकमत होऊन ठराव घेण्यात आला. तसेच बोरगाव (टुमनी) ग्रामपंचायतील संगणक चालकाच्या उपोषणाचाही विषय सदस्यांनी सभागृहात मांडला. या ग्रामपंचायतीने उत्पन्न कमी असल्याने १४ व्या वित्त आयोगातून या संगणक चालकाचे ११ महिन्याचे वेतन देण्यास ग्रामापंचायत असमर्थ असल्याने हे गाव नजिकच्या वडाळा या गावासोबत जोडावे जेणे करुन उत्पन्न वाढेल आणि समस्याही निकाली निघेल, अशाही सूचना सदस्यांनी केल्या. त्यावरुन अधिकाºयांनी सहमती दर्शविल्याचेही सांगण्यात आले आहे. सोबतच इतरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावेशहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गावर भुयारी बोगदा तयार करण्यात आला असून दोन्ही बाजुने अ‍ॅप्रोच रोडवरुन वाहतूक सुरु आहे. अ‍ॅप्रोच रोड पुर्णत: उखरलेला असून वाहनांमुळे त्यावरील धूळ परिसरात पसरत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनाही श्वसनाचे आजार बळावले आहे. त्यामुळे या अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावे, यासाठी सभागृहाने ठराव घेऊन जिल्हाधिकाºयांना पाठवावा. तसेच जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी गटनेता संजय शिंदे यांनी केली.वर्कआॅर्डरला मुदतवाढ द्याअनेक विकासात्मक कामांचे वर्क आॅर्डर झाले आहे. परंतु पाण्यामुळे कामांना थांबा देण्यात आला. सोबतच वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यानेही कामे थांबली होती. आता घाटाचा लिलाव होऊन अल्पावधीतच त्यावर स्थगिती आल्याने वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे विकासात्मक कामे ठराविक वेळात कसे पुर्ण करावे, असा प्रश्न कंत्राटदांपुढे असल्यामुळे कंत्राटदारांना वाळू ऐवजी चुरी वापरण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांच्या वर्क आॅर्डलाही मुदत वाढ द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.शासकीय बांधकाम बंद कराजिल्ह्यातील पाणी समस्या लक्षात घेत नागरिकांनी बांधकाम बंद केले आहे. परंतु शासकीय बांधकाम अजुनही जोमात सुरु असल्याने त्यावर टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असताना दुसरीकडे शासकीय बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरु आहे. त्यामुळे शासकीय बांधकामेही बंद करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.