शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

मोर्चातून वाढीव आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:26 IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला.

ठळक मुद्देयोग्य कार्यवाहीसाठी खासदारांसह आमदारांना साकडे : मुख्यमंत्र्यांनाही पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच ५० टक्केच्यावर आरक्षण नसावेच या मुख्य मागणीसाठी हिंदू, मुस्लिम, जैन, सिख, ईसाई आदी धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन रविवारी वर्धा शहरातून मोर्चा काढला. हे आंदोलन सेव्ह मेरीट सेव्ह नेशन समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चाचा समारोप अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे झाला. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर मोर्चात तरुण-तरुणी, महिला-पुरूष तसेच बच्चेकंपनी आणि वयोवृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समारोपप्रसंगी दोघांनी केले मनोगत व्यक्तसदर मोर्चाचा समारोप अनेकांत स्वाध्याय मंदिराच्या आवारात झाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन खा. तडस व आ. भोयर यांना सादर करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. मोर्चाच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान नागपूरचे डॉ. अनिल लद्धड, डॉ. राजेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले.बालकही उतरले रस्त्यावरसदर मोर्चाचे नेतृत्त्व १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांनी केले. ‘मेरीट का अब यह है कहना... मुश्किल हो गया इस देश मे रहना’ अशा आशयाचा मजकुल लिहून असलेला फलक हातात घेऊन ते या मोर्चात सहभागी झाले होते.तरुण-तरुणींनी नोंदविला निषेधआरक्षणाच्या मुद्यावरून नागरिकांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या व्यक्तीला खरोखर आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण देण्यात यावे. शिवाय आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच्यावर जाता कामा नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी केली.शिवाय सरकारच्या दुर्लक्षित धोरणाचा यावेळी निषेध नोंदविला.मोर्चात यांचा राहिला सिंहाचा वाटामोर्चाच्या आयोजनाकरिता महाराष्ट्र ब्राह्मण सभा, उत्तर भारतीय समुदाय, पंजाबी सेवा समिती, सिंधी पंचायत, गुजराती समाज, अग्रवाल समाज, जैन समाज, माहेश्वरी समाज, कोमठी समाज, बोहरा समाज, कच्छी समाज, मुस्लिम समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले. इतकेच नव्हे, तर समाजबांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादसदर मोर्चात विविध धर्माच्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन वाढीव आरक्षणाच्या विरोधात आवाज बुलंद केला.स्वच्छ शहराचा उद्देश जोपासलाआंदोलनात सहभागी झालेल्यांना ठिकठिकाणी पिण्याचे पाणी वितरीत करण्यात आले. परंतु, पाणी पिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रिकामा कागदी ग्लास रस्त्यावर टाकू नये या उद्देशाने ठिकठिकाणी खरड्याच्या कचराकुंडी ठेवण्यात आल्या होत्या. याच कचरापेट्यांमध्ये आंदोलकर्त्यांनी पाणी प्यायल्यानंतर रिकामा झालेला ग्लास टाकून स्वच्छ शहराचा उद्देश जोपासला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.योग्य कार्यवाहीसाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे -सराफशिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यासारख्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला जिल्हाप्रमुख म्हणून नेमले. शिवसेना पक्षात कधीही जातीपातीचा भेदभाव झालेला नाही. ‘मेरिट बचाओ राष्ट्र बचाव‘ हे अभियान कोणत्याही जातीचे अहित करणारे नाही. सर्वांना समान आणि गुणवत्तेनुसार न्याय मिळावा हाच एकमेव उद्देश आहे. याबाबत आज निवेदन प्राप्त झाले. मी जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीची मागणी करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी दिली.व्यापाऱ्यांनीही रविवारी दुपारी १२ पर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.