शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या पाच विभागातील विभाजनाला विरोध

By admin | Updated: December 24, 2015 02:48 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सन २००६ मध्ये तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. आता महावितरण कंपनीचे आणखी पाच विभागात ...

वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सन २००६ मध्ये तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. आता महावितरण कंपनीचे आणखी पाच विभागात विभाजन करण्याची घोषणा राज्य शासनातर्फे करण्यात आली. या विभाजनास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केला असून या विरोधात मोर्चा काढण्याचे प्रस्तावित आहे. महावितरण कंपनीचे विभाजन करण्याऐवजी राज्यातील सर्व १६ झोन कार्यालयांना सक्षम बनवून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे आणि विभागीय कार्यकारी संचालक यांच्या नियंत्रणात संघटनेने सुचविल्यानुसार अंतर्गत सुधारणा नुसार महावितरण कंपनीला आर्थिक, प्रशासनिकदृष्ट्या पारदर्शक बनवून ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांचेकडे केली आहे. विभागीकरणामुळे महावितरण कंपनीचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व प्रशासनिक हित जोपासले जाणार नसून राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढून खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती, पदोन्नती, घटनात्मक अधिकार यावर त्यामुळे गंभीर परिणाम होणार असल्याने राज्य शासनाने विभागीकरणाचे पाऊल मागे न घेतल्यास राज्यातील ६० हजार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पंसख्यांक वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही प्रलंबित मागण्यांसाठी सर्व वीज कर्मचाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)