शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पांढऱ्या सोन्यावर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

मागील महिन्यात परतीच्या पावसाने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली. परंतु, सध्या अचानक कपाशीची पान पिवळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर बोंडही काळे येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देआहेत पिवळी : उत्पादनात घट येण्याची शक्यता, कृषी विभागाबाबत वाढतोय रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पांढरे सोन म्हणून कपाशी पिकाची ओळख. परंतु, सध्या याच पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.मागील महिन्यात परतीच्या पावसाने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली. परंतु, सध्या अचानक कपाशीची पान पिवळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर बोंडही काळे येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हवालदील झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे. पुर्वीच परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीचे समाधानकारक उत्पन्न होईल, अशी आशा असताना पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.बोंड सडली, पांढऱ्या माशीसह तुडतुड्यांचा अटॅकचिकणी (जामणी) : गेल्या तीन महिन्यात पावसाने कपाशी उत्पादक शेतकºयांना सळो की पळो करून सोडले; पण पिकाचे योग्य पद्धतीने संगोपन केल्याने पिकाची वाढही बºयापैकी झाली. असे असले तरी सध्या अचानक कपाशी पीक पिवळे पडत आहे. शिवाय पांढऱ्या माशीचा तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव सध्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. तर काही शेत शिवारात पाती गळ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर वयोवृद्ध शेतकºयांकडून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिसरातील काही कपाशीचे पीक पिवळे पडत आहे तर काही ठिकाणी झाडाला लागलेली बोंड काळी पडल्याचे चित्र बघावयास मिळते. त्यामुळे कपाशी पिकावर हा कुठल्या नवीन रोगाचा प्रादुर्भाव आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरडवाहू शेतकºयांना यंदा कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर होईल, असाही अंदाज सध्या वर्तविला जात आहे. शेतकºयांची अडचण लक्षात घेत कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शिवार भेटी देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.मी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. सिंचनाची सोय असल्यामुळे कपाशी चांगली बहरली;पण अती पावसामुळे झाडाच्या खालच्या भागाचे बोंड काळे येत कुजत आहेत. असे का होत आहे हे आमच्या समजण्यापलीकडे आहे.- अमोल पारोदे, शेतकरी, चिकणी.सततच्या पावसामुळे शेत जमिनीची पाहिजे तशी मशागत झाली नाही. यामुळे सध्या जमीन कडक आली आहे. जमीन भुसभुसीत असली की मुळांना अन्न द्राव्य उत्तम प्रकारे मिळते. परंतु, सध्या कपाशीची पाती गळ होत आहे. त्यामुळे आमच्या अडचणीत भर पडली आहे.- विजय बेलसरे, शेतकरी, जामणी.यंदा अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कपाशीचे झाडाची वाढ बºयापैकी झाली. परंतु, बोंडे फारच बारीक आहेत. बारीक बोंड फुटत असल्यामुळे आणि कपाशी झाडावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव असल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.- विठ्ठल झोड, शेतकरी, चिकणी.अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखीसेवाग्राम : कपाशी पिकावर अद्यात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने परिसरातील कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कपाशीची पाने अचानक पिवळी पडत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाला विलंब झाला. तर नंतर जो पाऊस झाला त्याने शेतकºयांना दिलासाच दिला. परंतु, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तर झालेला पाऊस तूर पिकासाठी फायद्याचा ठरला. असे असले तरी परतीच्या पावसानंतर सध्या कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.तुळजापूर येथील शेतकरी हेमंत जिकार यांच्या शेतातील चार एकरावरील कपाशीचे पीक सध्या पिवळे पडले आहे. त्यामुळे त्यांच्या संकटात भर पडली आहे. उभे पीक पिवळे पडत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती