शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ वर्धेतच रॉयल्टीचे ‘शौर्य’

By admin | Updated: March 28, 2016 01:59 IST

राज्यभरात वाळुमाफियांचे प्रस्थ वाढले आहे. तलाठी, महसूल अधिकारी, तहसीलदारांच्या अंगावर जाईपर्यंत घटना घडल्या.

प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धाराज्यभरात वाळुमाफियांचे प्रस्थ वाढले आहे. तलाठी, महसूल अधिकारी, तहसीलदारांच्या अंगावर जाईपर्यंत घटना घडल्या. यामुळे शासनाने वाळु माफियांवर अंकूश लावण्यासाठी विविध तंत्र अवलंबिले. गतवर्षी ‘स्मॅट’ एसएमएस प्रणाली तर यावर्षी ‘शौर्य’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले. राज्यात शौर्य हे सॉफ्टवेअर सुरू होईपर्यंत घाटांना आॅर्डर देण्यात आले नव्हते; पण केवळ वर्धा जिल्ह्यात वाळु माफियांना छापिल रॉयल्टी बुक देण्याचे ‘शौर्य’ महसूल विभागाने दाखविल्याचे समोर आले आहे. यातून तब्बल दीड महिना रेतीची लयलूट झाली.वर्धा जिल्ह्यातील प्रथम २६ आणि नंतर तीन असे २९ घाटांचे लिलाव करण्यात आले. यातील बहुतांश घाटांची रेती उचल करण्याची क्षमता ५०० ते १५०० ब्रासपर्यंत निर्धारित करण्यात आली. या रेतीघाटांवर अंकूश ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनाने प्रारंभीच शौर्य अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. जिल्ह्यात शौर्य अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित होण्यापूर्वीच घाटांतून रेती उपस्याला परवानगी देण्यात आली. प्रारंभी सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीसाठी रेतीघाट धारकांना छापिल रॉयल्टी बुक देण्यात आले. परिणामी, रेती उपस्यावर कुठलाही अंकूश नव्हता. घाट सुरू झाल्यानंतर २०० ते ५०० ब्रास रेतीचा उपसा साधारण आठ ते दहा दिवसांत पूर्ण होता. मग, रॉयल्टी बुकवरच रेतीचा उपसा व वाहतुकीची संधी मिळाल्यावर सोडणार कोण? राज्यभर शौर्य हे अ‍ॅप्लिकेशन सुरू झाल्यानंतर रेतीचा उपसा सुरू झाला. यामुळे अधिक घोळ करता आला नाही. जिल्ह्यात दीड महिना रॉयल्टी बुकवरच रेतीची वाहतूक झाली. यानंतर शौर्य अ‍ॅप्लिकेशन सुरू झाले; पण यातही चोरट्यांनी पळवाट शोधली. ‘डी-एसएमएस’ पाठवून रेतीची चोरटी वाहतूक सबंध जिल्हाभर केली जात आहे. शौर्य या अ‍ॅप्लिकेशनमध्ये वाहन क्रमांक टाकला की संबंधित घाटधारकाचे नाव, घाटाची ब्रास कॉन्टीटी, पावती क्रमांक यासह रेती कुठे नेली जात आहे, ही संपूर्ण माहिती उपलब्ध होते. हे अ‍ॅप्लिकेशन रेती चोरट्यांवर आळा घालण्याचे चांगले माध्यम आहे; पण अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अज्ञान, प्रशिक्षणाचा अभाव या बाबी चोरट्यांना चालना देत आहेत. जिल्ह्यात कुठेही शौर्य या अ‍ॅप्लिकेशनबाबत तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षणच देण्यात आले नाही. शिवाय बहुतांश तलाठी, ग्रामसेवकांजवळ ‘अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल’ उपलब्ध नाहीत. असले तरी ते स्वत: इंटरनेटचा वापर करीत पकडलेले वाहत तपासतीलच, याची हमी नाही. यामुळेच शौर्य अ‍ॅप्लिकेशनही जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचेच दिसून येत आहे.भ्रमणध्वनी उत्तर देईना४रेतीघाट, शौर्य अ‍ॅप्लिकेशन व कारवायांबाबत अधिक माहिती घेण्याकरिता खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. यामुळे विभागाची भूमिका कळू शकली नाही.प्रथम २६ व नंतर ३ घाटांचा लिलाव करण्यात आला. कंत्राटदारांना त्रास होऊ नये म्हणून रॉयल्टी बुक देण्यात आले. शौर्य अ‍ॅप्लिकेशनही जिल्ह्यात कार्यान्वित आहे.- वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा