शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

चार वर्षात केवळ दोन तक्रारी

By admin | Updated: February 8, 2015 23:37 IST

आई वडिलांना रस्त्यावर आणणाऱ्या पोटच्या मुलांविरूद्ध दाद मागता यावी यासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. जिल्ह्यात मात्र ज्येष्ठांना या न्यायाधिकरणाची माहितीच

ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण : हिंगणघाट वगळता कुठेही तक्रार नाहीपराग मगर - वर्धाआई वडिलांना रस्त्यावर आणणाऱ्या पोटच्या मुलांविरूद्ध दाद मागता यावी यासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. जिल्ह्यात मात्र ज्येष्ठांना या न्यायाधिकरणाची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. हिंगणघाट उपविभाग वगळता इतर कुठेही या प्रकारातील तक्रारी दाखल नाहीत. या न्यायाधिकरणाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरिता शासनाच्यावतीने जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. गत काही वर्षांत कुटुंबांचे विभक्तीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मुलांचे आयुष्य स्थीरस्थावर व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या पालकांनाच मुले रस्त्यावर आणत आहेत. आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व चरितार्थासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम २०१० पारित केला. यातून जन्मदात्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी वारस किंवा अपत्यांवर सोपविली आहे. वृद्धापकाळात सांभाळ करण्यास नकार व निर्वाह भत्ता न दिल्यास ज्येष्ठ नागरिकांना या निर्वाह न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या उपविभागात न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. त्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहेत. हिंगणघाट उपविभाग वगळता वर्धा व आर्वी येथे एकही तक्रार आली नसल्याची माहिती आहे. हिंगणघाट उपविभागात दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्यांचा निकाल लागल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात न्यायाधिकरणची स्थापना राज्यातील सर्व जिल्ह्यातील उपविभागासाठी न्यायाधिकरण स्थापन केले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने २८ सप्टेंबर २०१० ला काढलेली आहे. अपिलासाठी न्यायाधिकरण असून, त्याचे पीठासीन अधिकारी जिल्हा दंडाधिकारी आहेत.