शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

दक्षता हीच खरी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:13 IST

पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी धडपड : शासकीय व खाजगी रूग्णालय हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.डेंग्यू सदृश्य आजार सर्वत्रच बळावल्याने रुग्णालयातील गर्दीही वाढली. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयही हाऊसफुल्ल झाले आहे. सावंगी, सेवाग्राम रुग्णालयात जागेअभावी सध्या ५० लाखांपेक्षा कमी प्लेटलेट्स असलेल्यांनाच दाखल करुन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिके च्यावतीने स्वच्छत करण्यात आली. १८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृतीही केली. तसेच फॉगींग व फवारणीही कमी करण्यात आली.परंतू नागरिकांनी अद्यापही मनावर घेतले नाही. ही जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि पालिकेवर लोटली जात असल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे प्रशासकीय यंत्रना व पालिकेसोबतच आपली जबाबदारी ओळखून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली तर अशा आजाराला बळी पडावे लागणार नाही.घरातच डासांची उत्पत्तीवारंवार सूचना करुनही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने घरामध्येच मोठ्या प्रमाणात डेेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरामध्ये अजूनही कुलर लागले असून त्यात पाणी साचले आहे. घरातील पाण्याची टाकी कोरडी केली जात नाही. तसेच फ्र ीजमध्ये जमा होणारे पाणीही साफ केले जात नाही. व इतरही साठवून ठेवलेले पाणी कायम राहत असल्याने डासांची उत्पत्ती होत आहे.पोलिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या. दोनदा फॉगींग करण्यात आले. फवारणीही झाली तसेच जनजागृतीही करण्यात आली.आता पुन्हा फॉगींग व फवारणी सुरु करण्यात येणार आहे.परंतू जोपर्यंत नागरिक स्वत: जागृत होणार नाही. तो पर्यंत या आजाराला आळा घालता येणार नाही. म्हणून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा

टॅग्स :dengueडेंग्यू