शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत गांजाचे केवळ २६ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:39 IST

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत.

ठळक मुद्देतस्करीकडे दुर्लक्ष : पोलिसांकडून कारवाईच्या नावावर देखावाच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना जिल्ह्यात दाखल गुन्ह्याची माहिती घेतली असता ती सर्वांना अवाक् करणारीच आहे. वर्धा जिल्ह्यात दोन वर्षांत केवळ २६ गुन्हे दाखल असून आरोपींच्या नावावर ४२ जणांनाच अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात पोलिसांकडून झालेली कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक, जिल्ह्यातील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत गांजाचा भर दिवसा धूर निघतो, तर शहरातील काही मोठ्या मैदानावर गांजा ओढणाºयाची टोळकी बसून राहत असल्याचे दिसून आले आहे. याची माहिती शहरातील पोलिसांना नाही, असे नाही; पण दारूच्या व्यवसायत मिळत असलेल्या आर्थिक लाभाची चटक असल्याने यातही मिळकतीची अपेक्षा ठेवून गांजा विके्रत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शहरात गांजा विक्रीचे अनेक ‘अड्डे’ निर्माण झाले आहेत.रेल्वेच्या जाळ्यात वर्धा मध्यभागी येत असल्याने वर्धेतील अनेक अवैध व्यवसायाला याचा लाभ मिळत आहे. वर्धेत आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन वर्षांत १२ गुन्हे दाखल करून २७ आरोपींना अटक केली आहे. यात काही आरोपी वर्धेत उतरून अमरावती येथे गांजा नेणारे असल्याचे समोर आले आहे.रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना नाही, असे नाही; पण त्यांच्याकडून कारवाईच्या नावावर केवळ चिल्लर विक्रेत्यांवरच कारवाई होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच वर्धेत गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांत राडा होऊन एकाचा जीव गेला. या प्रकरणातील आरोपी आणि मृतक गांजाच्या आहारी गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र त्यांच्यापर्यंत गांजा पोहोचला कसा, याचा शोध घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.काही पोलीसही गांजाच्या आहारीवर्धेत दारूबंदी असताना अनेक पोलीस दारूच्या आहारी गेल्याचे समोर आले आहेत. मद्यपान करून कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली. याप्रमाणेच अनेक पोलीस गांजाच्या आहारी गेल्याचेही दिसून येते. वर्धा शहरातील मध्यभागी असलेल्या पालिकेच्या अर्धवट बांधकामाचा लाभ उचलत मोठ्या प्रमाणात गांजाचा धूर निघत असतो. येथे काही पोलिसांकडूनही चिलम ओढण्याचा प्रकार घडल्याचे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणाºया कर्मचाºयांवर कारवाई करीत फोफावत असलेल्या गांजाच्या व्यवसायावर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.