शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दोन वर्षांत गांजाचे केवळ २६ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:39 IST

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत.

ठळक मुद्देतस्करीकडे दुर्लक्ष : पोलिसांकडून कारवाईच्या नावावर देखावाच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना जिल्ह्यात दाखल गुन्ह्याची माहिती घेतली असता ती सर्वांना अवाक् करणारीच आहे. वर्धा जिल्ह्यात दोन वर्षांत केवळ २६ गुन्हे दाखल असून आरोपींच्या नावावर ४२ जणांनाच अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यात पोलिसांकडून झालेली कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक, जिल्ह्यातील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत गांजाचा भर दिवसा धूर निघतो, तर शहरातील काही मोठ्या मैदानावर गांजा ओढणाºयाची टोळकी बसून राहत असल्याचे दिसून आले आहे. याची माहिती शहरातील पोलिसांना नाही, असे नाही; पण दारूच्या व्यवसायत मिळत असलेल्या आर्थिक लाभाची चटक असल्याने यातही मिळकतीची अपेक्षा ठेवून गांजा विके्रत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शहरात गांजा विक्रीचे अनेक ‘अड्डे’ निर्माण झाले आहेत.रेल्वेच्या जाळ्यात वर्धा मध्यभागी येत असल्याने वर्धेतील अनेक अवैध व्यवसायाला याचा लाभ मिळत आहे. वर्धेत आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन वर्षांत १२ गुन्हे दाखल करून २७ आरोपींना अटक केली आहे. यात काही आरोपी वर्धेत उतरून अमरावती येथे गांजा नेणारे असल्याचे समोर आले आहे.रेल्वेतून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना नाही, असे नाही; पण त्यांच्याकडून कारवाईच्या नावावर केवळ चिल्लर विक्रेत्यांवरच कारवाई होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच वर्धेत गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांत राडा होऊन एकाचा जीव गेला. या प्रकरणातील आरोपी आणि मृतक गांजाच्या आहारी गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र त्यांच्यापर्यंत गांजा पोहोचला कसा, याचा शोध घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.काही पोलीसही गांजाच्या आहारीवर्धेत दारूबंदी असताना अनेक पोलीस दारूच्या आहारी गेल्याचे समोर आले आहेत. मद्यपान करून कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली. याप्रमाणेच अनेक पोलीस गांजाच्या आहारी गेल्याचेही दिसून येते. वर्धा शहरातील मध्यभागी असलेल्या पालिकेच्या अर्धवट बांधकामाचा लाभ उचलत मोठ्या प्रमाणात गांजाचा धूर निघत असतो. येथे काही पोलिसांकडूनही चिलम ओढण्याचा प्रकार घडल्याचे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणाºया कर्मचाºयांवर कारवाई करीत फोफावत असलेल्या गांजाच्या व्यवसायावर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.