शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आॅनलाईन सेवा ठरतेय कुचकामी

By admin | Updated: July 6, 2015 02:21 IST

सध्या दूरध्वनी सेवेला घरघर लागली आहे. यामुळे भारत संचार निगमनेही मोबाईल आणि इंटरनेट जगतात नवीन तंत्रज्ञान आले; ...

भारत संचार निगमचा प्रतापंतक्रार निवारणाकरिता लागतात १५ ते २० दिवसवर्धा : सध्या दूरध्वनी सेवेला घरघर लागली आहे. यामुळे भारत संचार निगमनेही मोबाईल आणि इंटरनेट जगतात नवीन तंत्रज्ञान आले; पण दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळेच सध्या दूरध्वनी सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संपूर्ण सेवा आॅनलाईन करण्याच्या प्रयत्नात बीएसएनएलने दूरध्वनीच्या तक्रारी सोडविण्यात हयगयच चालविली आहे. यामुळे ग्राहक त्रस्त असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.भारत संचार निगमने सर्वप्रथम दूरध्वनी सेवा सुरू केली. शासनाच्या या प्रथम सेवेला संपूर्ण देशात डोक्यावर घेतले गेले. सर्वाधिक ग्राहक संख्या बीएसएनएलला मिळविता आली. यानंतर मोबाईल क्रांती झाली असून खासगी कंपन्या सरसावल्या. दिवसेंदिवस मोबाईलमध्ये स्पर्धा वाढली आणि संचार निगमची सेवा मागे पडली. या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलनेही मोबाईल जगतात उडी घेतली. शिवाय ब्रॉडबॅन्ड ही इंटरनेट सेवाही सुरू केली. प्रारंभी चांगली वाटणारी ही बीएसएनएलची सेवा नंतर मात्र ढेपाळत गेली. सध्या दूरध्वनी व मोबाईल सेवेसह इंटरनेट सेवाही कुचकामीच ठरत आहे. दूरध्वनीमध्ये वारंवार बिघाड येत असून मोबाईल कव्हरेजअभावी खेळण्याची वस्तू ठरतेय. आजही ग्रामीण भागात संचार निगमचे कव्हरेज मिळत नाही. यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असले तरी शासकीय सेवा असलेल्या बीएसएनएलकडे ग्राहक पाठ फिरवितानाच दिसतात. सध्या दूरध्वनी सेवा सुरू असली तरी ती केवळ इंटरनेट सुविधेकरिताच वापरली जात असल्याचे दिसते. दूरध्वनी सेवेतील वारंवार होणारे बिघाड ग्राहकांचा पाठलाग करीत असल्याचेच दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूरध्वनी सेवांमध्ये बिघाड येत असून कुणाचे दूरध्वनी संच नादुरूस्त होताहेत तर कुठे केबलमधील बिघाडामुळे ते बंद आहेत. या प्रकारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. कागदमुक्त काम करण्याकरिता संचार निगमने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा प्रयत्न केला. बीएसएनएलचा हा प्रयत्नही फसतानाच दिसते. अन्य सिमकार्ड कंपन्यांची आॅनलाईन सेवा सुरळीत सुरू असताना संचार निगमच्या सेवेत बऱ्याच त्रुटी आढळून येतात. दूरध्वनी सेवेतील बिघाडाबाबत तक्रारीसाठी १९८ हा क्रमांक देण्यात आला आहे. यावर तक्रार नोंदविल्यानंतर आठ दिवसांच्या आत तक्रारीचे निरसन होणे अपेक्षित असते; पण यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यातही आॅनलाईन तक्रार नोंदविली जाते. ती संबंधित कार्यालयाकडे सोपविली जाते आणि तेथील अधिकाऱ्यांद्वारे ती तक्रार लागलीच तपासली जात नसल्याने विलंब होतो. शिवाय एका दिवसात सुमारे ३० तक्रारी आल्या तर मनुष्यबळाचा अभाव असल्याने केवळ १० तक्रारींचे निरसन होऊ शकते. यामुळे २० तक्रारी प्रलंबित राहतात. अशा दररोजच्या तक्रारी प्रलंबित राहत असल्याने कित्येक दिवस दूरध्वनी संच केवळ घराची शोभा वाढविताना दिसतो. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कार्यालयातील तक्रारींना प्रथम प्राधान्य; कर्मचाऱ्यांचाही अभावभारत संचार निगममध्ये सध्या तालुका स्थळी मनुष्यबळ कमी झाले आहे. बिघाड दुरूस्त करण्याकरिता लागणारे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने एका दिवसात अधिक तक्रारींचे निरसन करणे शक्य होत नाही. कर्मचाऱ्यांचे पथक बिघाड दुरूस्तीसाठी पाठविले जाते; पण कर्मचारी कमी असल्याने ते अधिक ठिकाणी जाऊ शकत नाहीत. यामुळे तक्रार दुरूस्तीचे प्रमाण कमी झाले आहे.आॅनलाईन तक्रारी पाहिल्याच जात नाहीग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार क्रमांक देण्यात आला आहे. यावर केलेली तक्रार संबंधित जिल्हा व तालुक्यातील कार्यालयाकडे सोपविली जाते. यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी सदर तक्रार तपासून तेथे कर्मचारी पाठविणे गरजेचे असते; पण कित्येक दिवस या तक्रारी तपासल्याच जात नाहीत. यामुळे तक्रार करूनही दूरध्वनी संच सुरू होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.अधिकारीही हतबलग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करतात; पण वारंवार बिघाड येत असल्याने तेही हतबल झाले आहेत. दूरध्वनीच्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या तक्रारी दूर करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. शिवाय बिघाड लवकर दुरूस्त होत नसल्याने ग्राहकांना दूरध्वनी सेवा नकोशी झाल्याचे चित्र आहे. आॅनलाईन तक्रारी बिघाडाच्या प्रकारावर अवलंबून असतात. मोठा आणि जमिनीच्या आतील बिघाड असेल तर मिटर लावून लोकेट करावा लागतो. या प्रकारच्या तक्ररी एकदा दूर झाल्या की त्या वारंवार उद्भवत नाही. अन्य तक्रारी नोंदणी करताच सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचारीही तत्परच असतात.- एच.के. चव्हाण, उपविभागीय अधिकारी, भारत संचार निगम लि. वर्धा.