शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

आॅनलाईन फेरफारने डोकेदुखीत वाढ

By admin | Updated: December 22, 2016 00:33 IST

देशात आधुनिक क्रांती व्हावी व नागरिकांना लवकर सुविधा मिळाव्या या हेतूने सरकारने आॅनलाईन व्यवहाराला चालना दिली.

शेतकरी त्रस्त : सातबारा काढण्याकरिता होते कसरत श्यामकांत चिचाटे  नाचणगाव देशात आधुनिक क्रांती व्हावी व नागरिकांना लवकर सुविधा मिळाव्या या हेतूने सरकारने आॅनलाईन व्यवहाराला चालना दिली. शेती, प्लॉट यांचे खरेदी व्यवहार खरेदी-विक्री कार्यालयात होतात. यातील फेरफार आॅनलाईन पद्धतीने केले जातात;पण संथ इंटरनेटमुळे ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक बसत आहे. सातबारा काढताना शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तहसील कार्यालयात व्यवहार झाल्यावर सदर व्यवहाराचा मॅसेज हा पुणे येथील केंद्रात जातो. त्यानंतर देवळी तहसील कार्यालयात मॅसेज येतो. यानंतर मंडळ कार्यालयात हा मॅसेज पाठविला जातो. अशा तऱ्हेने या खरेदी-विक्री व्यवहारात आॅनलाईन फेरफार होतो. परंतु पुण्यावरुन सदर मॅसेज देवळी कार्यालयाला लवकर प्राप्त होत नसल्याने प्रमाणपत्र घेण्यात व्यत्यय येत आहे. या कार्यालयातून पुलगाव किंवा मंडळ कार्यालयात यायला महिने लागतात. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकाला या प्रक्रियेत खुप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत प्लॉट अथवा शेताच्या फेरफारचा सातबारा घेण्यास ग्राहक गेल्यावर त्याला तो मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. पूर्वी खरेदी-विक्री व्यवहाराची प्रत मंडळ किंवा तलाठी कार्यालयाला द्यावी लागत होती. यानंतर काही दिवसातच फेरफार प्रत मिळत होती. परंतु आॅनलाईन प्रक्रियेत अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवसभर असते लोडिंग सुरूच आॅनलाईनपेक्षा आॅफलाईन पद्धतीने काम लवकर होत असल्याचे दिसत आहे. आॅनलाईन प्रणालीने कामात अडचण होत असल्याने खर्च अधिक होत आहे. त्यामुळे आॅनलाईनपेक्षा आॅफलाईन बरे असे अनेकांना वाटत आहे. कर्मचारी असमर्थ हस्तलिखित सातबारा देण्यात यावा यावर अधिवेशनात चर्चा झाली. परंतु आॅनलाईन फेरफार करण्याकरिता प्रक्रिया झाली नाही तर हस्तलिखीत सातबारा द्यायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आॅनलाईन फेरफार प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नसल्याचे तलाठ्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रासाठी फेरफारचे एकच सॉफ्टवेअर आहे. ते जलदगतीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. सकाळी दहा साडेदहापर्यंत सदर प्रणाली व्यवस्थित कार्य करते. परंतु नंतर ही कार्यप्रणाली मंदावते. आॅनलाईनची कामे आता संध्याकाळी करायची काय, अशा प्रश्न तलाठ्यांना पडला आहे. या प्रणालीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त होत आहे.