शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याला तिलांजली

By admin | Updated: November 6, 2014 02:13 IST

इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आॅन-लाईन आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून ...

वर्धा : इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आॅन-लाईन आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून भरण्याच्या आदेशाकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी पालकांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतला आहे. शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शिक्षक समितीच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे आॅनलाईन भरण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या आणि नगर पालिकांच्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने आॅनलाईन आवेदनपत्रे कार्यालयामार्फत भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ३० आॅक्टोबर २०१४ ला आदेश काढून जिल्हा परिषदेच्या व नगर पालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावरून आॅनलाईन भरावीत आणि यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या होत्या. मात्र कामाची जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागाने सदर सूचना प्राथमिक शाळांना कळविल्या नाही. उलट मुख्याध्यापक-शिक्षकांनी आपल्या स्तरावरून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आॅन-लाईन फॉर्म तात्काळ भरण्याचा तगादा लावला आहे. आॅनलाईन आवेदनपत्रे निशुल्क भरण्याच्या आदेशाकडे पं.स.च्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे इंटरनेट सुविधेसाठी पालकांना, मुख्याध्यापक-शिक्षकांना नाहक भुर्दंड बसत आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिखक समितीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर केले असून, पंचायत समिती स्तरावरून आवेदनपत्रे, निशुल्क भरण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.सोबतच जि.प. च्या सेस-निधीतून ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरले जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही कोणत्या पद्धतीने करावी, याचेही निर्देश निर्गत करण्याची मागणी समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, भुते, प्रकाश काळे, बोबडे, बाराहाते, भोकरे, ताटेवार, कावळे आदींनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)