शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांतून एकाची हत्या

By admin | Updated: May 19, 2016 01:41 IST

अनैतिक संबंधांतून प्रियकराने आपल्या पे्रयसीच्या पतीची निर्घृण हत्या केली. अनैतिक संबंध आणि जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

सेलू, आर्वी तालुक्यात थरार : झोपेतच चालविले हत्यारसिंदी (रेल्वे) : अनैतिक संबंधांतून प्रियकराने आपल्या पे्रयसीच्या पतीची निर्घृण हत्या केली. अनैतिक संबंध आणि जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हत्या करण्यात आल्याचे समोर आले. ही घटना बुधवारी पहाटे २ ते २.३० वाजताच्या सुमारास येथे घडली. घटनेचे वृत्त पसरताच गावात खळबळ माजली. नरेश गोल्हर यांच्या शेतावर बाबाराव यादवराव परतेकी (३५) हा सालकरी म्हणून कार्यरत होता. त्याच्या पत्नीशी शरद रामचंद्र रहाटे (३८) याचे अनैतिक संबंध होते. हे प्रेमप्रकरण अनेक वर्षांपासून सुरू होते. दोन वर्षांपूर्वी परतेकी यांची पत्नी व शरद हे दोघे पळून गेले होते. यानंतर ती परत येऊन पुन्हा पतीसोबत राहू लागली; पण प्रेमसंबंध सुरूच होते. या प्रकरणावरून बाबाराव व आरोपी शरदचा वादही झाला होता. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठीच बुधवारी रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास बाबाराव आणि त्यांची पत्नी झोपेत असताना शरदने शस्त्राने गळ्यावर वार करून बाबाराव परतेकी यांची निर्घृण हत्या केली.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित आरोपीचा शोध घेतला. पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास हेलोडी परिसरातून शरद रहाटे याला अटक करण्यात आली. या प्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वसंत मोहुर्ले घटनेचा पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)दगडाने ठेचून पत्नीचा खूनआर्वी : क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. शोभा वसंतराव कुरझडकर, असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, १५ वर्षांपूर्वी वसंत कुरझडकर याचा विवाह शोभा उदेभान कुंभेकार रा. सावंगी पोळ ता. आर्वी हिच्याशी झाला होता. पती-पत्नी रखवालीचे काम करीत होते. हे पती-पत्नी चार-पाच महिन्यांपूर्वी शरद निखार याच्या शेतात आले होते. घटनेच्या दिवशी वसंत रोहणा येथे बाजारासाठी गेला होता. परत येताना तो पत्नीच्या सावंगी पोळ या गावी गेला व तिला शेतात घेऊन आले. रात्री दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पती वसंताने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार शैलेश साळवी, उपनिरीक्षक अर्चना भूत यांनी घटनास्थळ गाठत आरोपी पतीला ताब्यात घेतले.(तालुका प्रतिनिधी)