शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

एका जनावरामागे पालिकेला दीडशे रुपयांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:39 IST

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची चांगलीच गर्दी असल्याचे दिसून आले आहे.

१४ दिवसांत २८ मोकाट जनावरे बंद महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची चांगलीच गर्दी असल्याचे दिसून आले आहे. मालकांकडून मोकाट सोडलेली जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता बळावत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेकडून ही जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यात पकडलेल्या एका जनावराच्या चारापाण्यापोटी पालिकेला तब्बल दीडशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पालिकेच्यावतीने पकडण्यात आलेली जनावरे पिपरी (मेघे) येथील पिपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या करूनाभश्रमात देण्यात येत आहे. येथे मोकाट जनावरांना चारा पाण्याकरिता रक्कम आकरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्यापासून पालिकेकडून राबविण्यात येत असून आतापर्यंत तब्बल २८ जनावरे पकडली आहेत. यात तीन मालकांकडून ही जनावरे आपली असल्याचे सांगितले आहे. या तिघांकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वर्धा नगर पालिकेचे कर्मचारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शहरातील विविध भागात फिरून आढळून आलेले मोकाट जनावरे ताब्यात घेत आहेत. आतापर्यंत या पथकाने मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात शहर परिसरातून २८ जनावरे ताब्यात घेतली आहेत. ही मोहीम पथक प्रमुख अशोक ठाकूर यांच्यासह पालिकेचे १५ कर्मचारी कार्यरत आहेत. जनावरांच्या वयावरून आकारला जातो दंड मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेले मोकाट जनावरे जनावर मालकाकडून दंड वसूल करून त्यांच्या स्वाधीन केले जातात. पकडण्यात आलेल्या छोट्या जनावरांसाठी २ हजार ५०० रुपये तर मोठ्या जनावरांसाठी ५ हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. पथकातील कर्मचारी मोकाट जनावरांना पकडून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून ते करुणाश्रमात नेतात. वर्धा न.प.ने ताब्यात घेतलेली मोकाट जनावरे जनावर मालकांनी वेळीच दंड भरून घेऊन न गेल्यास सदर जनावरांचा न.प.प्रशासन लिलाव करणार आहे. या लिलावात वर्धा शहरातील नागरिकाला सहभागी होता येणार नाही. - अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी न.प. वर्धा. लिलावातून पालिकेला कमाई पकडण्यात आलेल्या मोकाट जनावरांचा शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातून मिळणारी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईच्या गांभिर्यासाठी दंडाची रक्कम वाढविली पूर्वी मोकाट जनावरे अल्प दंड आकारून मालकांच्या स्वाधीन करण्यात येत होते. यामुळे जनावर मालकांकडून ही कारवाई गंभीर घेतल्या जात नसल्याचे दिसून आले. यावर मार्ग काढण्याकरिता पालिकेने आता दंडाची रक्कम वाढविल्याचे दिसून आले आहे. या दंड वाढीमुळे जनावरे रस्त्यावर येणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.