शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष

By admin | Updated: June 28, 2017 00:54 IST

मागील वर्षी आपण २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केली. आता ४ कोटी, त्यानंतर १३ कोटी आणि त्यापुढे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे.

अनिल सोले : आर्वीत अवतरली वृक्षदिंडीची मांदियाळी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षी आपण २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केली. आता ४ कोटी, त्यानंतर १३ कोटी आणि त्यापुढे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. एक झाड आपल्याला रोज २१०० रुपयांचे आॅक्सिजन मोफत देते आणि आपण त्याची परतफेड म्हणून काय देतो? असा सवाल करीत आ.प्रा अनिल सोले यांनी एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष, हा नारा दिला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ ते ७ जुलै दरम्यान चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या अभियानाच्या संकल्प पूर्तीसाठी ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे २२ जून रोजी चंद्रपूर येथून वृक्षदिंडी जनजागृती चेतना यात्रा काढली आहे. ही वृक्षदिंडी सोमवारी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा), तळेगाव, आर्वी व पुलगाव येथे पोहोचली. आर्वी येथील वृक्षदिंडीच्या स्वागत व संकल्प सभेत आ.प्रा. सोले बोलत होते. ते पूढे म्हणाले की, आजपासून २० वर्षांपूर्वी आपल्याला कुणी पाणी विकत देतो, असे म्हंटले असते तर लोक हसले असते; पण आज परिस्थिती बदलली आहे. आपण रेल्वे स्टेशनवर गेलो असता लोक नळावर पाणी भरताना दिसत नाही. थेट पाण्याची बॉटल विकत आणतात. म्हणजे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी आपण विहिरीचे पाणी गाळून पीत होतो. त्याच विहिरी आज कचरा गोळा करण्याचे साधन झाले आहे. आपल्या आजोबांच्या काळात ५० फुटावर पाण्याचा भूगर्भ साठा होता. वडिलांच्या काळात १०० फुटावर, आपल्या काळात २०० फुटावर गेला तर आता नातवाच्या काळात भूगर्भात पाणीच शिल्लक राहणार नाही. यापूर्वी शासनाने याबाबत पाणी अडवा पाणी जिरवा, अशा योजना केल्या; पण त्यात लोकसहभागाचा अभाव जाणवल्याने जनतेने त्याची खिल्ली उडविली आणि याला अडवा न त्याले जिरवा, अशी स्थिती निर्माण झाली. यात लोकसहभाग नसल्याने ही योजना अपयशी ठरली. यासाठी वृक्ष लागवड योजना लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आ. सोले यांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कारंजा (घा.) येथे गोळीबार चौकात वृक्षारोपण करण्याबाबत सभा झाली. तळेगाव येथेही नागरिकांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आर्वी येथे शिवाजी चौकात जाहीर वृक्षारोपण संकल्प सभा झाली. पुलगाव येथे न.प. सभागृहात वृक्षदिंडी संकल्प सभा पार पडली. याप्रसंगी जिल्ह्याला १२ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा निर्धार सहायक उपवनसंरक्षक बडेकर यांनी व्यक्त केला. वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात प्रत्यकाने एक तरी झाड लावावे व झाडाची कत्तल करणार नाही, अशी शपथ देण्यात आली. संकल्प सभेमध्ये वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन करण्याचा संदेशही देण्यात आला.