शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष

By admin | Updated: June 28, 2017 00:54 IST

मागील वर्षी आपण २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केली. आता ४ कोटी, त्यानंतर १३ कोटी आणि त्यापुढे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे.

अनिल सोले : आर्वीत अवतरली वृक्षदिंडीची मांदियाळी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षी आपण २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड केली. आता ४ कोटी, त्यानंतर १३ कोटी आणि त्यापुढे ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. एक झाड आपल्याला रोज २१०० रुपयांचे आॅक्सिजन मोफत देते आणि आपण त्याची परतफेड म्हणून काय देतो? असा सवाल करीत आ.प्रा अनिल सोले यांनी एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष, हा नारा दिला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ ते ७ जुलै दरम्यान चार कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविली जात आहे. या अभियानाच्या संकल्प पूर्तीसाठी ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनतर्फे २२ जून रोजी चंद्रपूर येथून वृक्षदिंडी जनजागृती चेतना यात्रा काढली आहे. ही वृक्षदिंडी सोमवारी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा), तळेगाव, आर्वी व पुलगाव येथे पोहोचली. आर्वी येथील वृक्षदिंडीच्या स्वागत व संकल्प सभेत आ.प्रा. सोले बोलत होते. ते पूढे म्हणाले की, आजपासून २० वर्षांपूर्वी आपल्याला कुणी पाणी विकत देतो, असे म्हंटले असते तर लोक हसले असते; पण आज परिस्थिती बदलली आहे. आपण रेल्वे स्टेशनवर गेलो असता लोक नळावर पाणी भरताना दिसत नाही. थेट पाण्याची बॉटल विकत आणतात. म्हणजे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी आपण विहिरीचे पाणी गाळून पीत होतो. त्याच विहिरी आज कचरा गोळा करण्याचे साधन झाले आहे. आपल्या आजोबांच्या काळात ५० फुटावर पाण्याचा भूगर्भ साठा होता. वडिलांच्या काळात १०० फुटावर, आपल्या काळात २०० फुटावर गेला तर आता नातवाच्या काळात भूगर्भात पाणीच शिल्लक राहणार नाही. यापूर्वी शासनाने याबाबत पाणी अडवा पाणी जिरवा, अशा योजना केल्या; पण त्यात लोकसहभागाचा अभाव जाणवल्याने जनतेने त्याची खिल्ली उडविली आणि याला अडवा न त्याले जिरवा, अशी स्थिती निर्माण झाली. यात लोकसहभाग नसल्याने ही योजना अपयशी ठरली. यासाठी वृक्ष लागवड योजना लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आ. सोले यांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कारंजा (घा.) येथे गोळीबार चौकात वृक्षारोपण करण्याबाबत सभा झाली. तळेगाव येथेही नागरिकांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आर्वी येथे शिवाजी चौकात जाहीर वृक्षारोपण संकल्प सभा झाली. पुलगाव येथे न.प. सभागृहात वृक्षदिंडी संकल्प सभा पार पडली. याप्रसंगी जिल्ह्याला १२ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा निर्धार सहायक उपवनसंरक्षक बडेकर यांनी व्यक्त केला. वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात प्रत्यकाने एक तरी झाड लावावे व झाडाची कत्तल करणार नाही, अशी शपथ देण्यात आली. संकल्प सभेमध्ये वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन करण्याचा संदेशही देण्यात आला.