शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

दीड एकरातील पीक गारद

By admin | Updated: July 18, 2016 00:38 IST

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले.

 धुऱ्यावर नालीचे खोदकाम : शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी आष्टी (शहीद) : पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वत:च्या शेताला हात न लावता शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील धुरा फोडून नालीचे खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्याचे दीड एकरातील पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले. नाली खोदणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचा आरोप बेलोरा (बुजरूक) येथील शेतकऱ्याने केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. बेलोरा येथील शेतकरी अंबादास जाणे यांची मौजा अहमदपूर साजा मध्ये ०.८१ आर (दोन एकर) शेती आहे. यावर्षी मोठ्या कष्टाने त्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. अंबादास यांचे वय ७२ वर्षे असल्याने त्यांच्याकडून अधिक धावपळ होत नाही. यामुळे शेतातील समस्या दिवसागणिक वाढत आहेत. बेलोरा गावातील चिरकुट बोरवार आणि गुलाब घाटोळे या दोन्ही शेतकऱ्यांनी धुऱ्याच्या तोंडावर नाली खोदून माती टाकली. पावसामुळे माती वाहून गेल्याने पाणी साचले. शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेताच्या मधोमध असणारा धुराच पूर्ण खोदण्यात आला आहे. याबाबत दोन्ही शेतकऱ्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न अंबादास यांनी केला; पण आमचेच बरोबर आहे म्हणत दोघांनीही मुजोरी कायम ठेवल्याचेच दिसते. यामुळे अंबादास यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतात तलाव साचला असताना अद्याप तहसीलदार, तलाठी यापैकी कुणीही शेताला भेट दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास यांच्यावर बँक तथा सावकाराचे कर्ज आहे. उत्पन्न झाले नाही तर कर्जाची परतफेड करणे त्यांना अवघड होणार आहे. पावसाचे पाणी दरवर्षी वाहून जाण्याचा मार्ग उपलब्ध असताना जाणीवपूर्वक नालीचे खोदकाम करून वेठीस धरण्याचा प्रयत्न दोन्ही शेतकरी करीत आहेत. परिणामी, आत्महत्या करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा मार्ग नाही, असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर कुणीही अधिकारी त्यांची समस्या ऐकून घेत नसल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे आपल्याला न्याय मिळणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरीच शेतकऱ्याचा वैरी झाल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. पाणी वाहून गेले नाही तर खरीपाचे कुठलेही पीक घेता येणार नाही. वर्षभर कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे साधन शेतीच असल्याने महसूल विभागाने त्यांना तात्काळ न्याय देणे गरजेचे झाले आहे. दीड एकर पीक उद्ध्वस्त करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा मला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. अंबादास जाणे यांनी शेतातील खोदकाम केलेल्या नालीबाबत प्रशासनाला सूचना देऊनही अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सरसावले नाही. महसूल विभागाचे अधिकारी यावर प्रतिक्रीया देण्यासही तयार नाहीत. मग, शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्याला न्याय मिळवू देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)