शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

जुन्या निविदांना नव्या दराने मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:53 IST

ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाद्वारे दरवर्षी निविदा काढल्या जातात.

ठळक मुद्देबांधकाम विभागातील प्रकार : देयके अडकल्याने ७४ कंत्राटदार कर्जबाजारी

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाद्वारे दरवर्षी निविदा काढल्या जातात. कंत्राटदार सातत्याने कामे घेऊन ती पूर्ण करीत होते; पण यंदा कामांना ग्रहण लागले. जीएसटीमुळे त्रस्त कंत्राटदारांनी दोन महिने संप केला. हा संप मिटला असून ई-निविदा निघाल्या; पण जुन्या अंदाजपत्रकांच्या निवीदांना नवीन दर आकारले आहे. देयके अडकल्याने ७४ कंत्राटदार कर्जबाजारी आहे. आता नवीन दरांनी कामे कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील वर्षभरापासून विविध कामांची देयके अडकली आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी बांधकाम विभागाच्या कार्यालयात कंत्राटदारांना प्रतीक्षा करावी लागली. अधिकारीही वरिष्ठांमुळे हतबल असल्याचेच दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ही वस्तूस्थिती कथन केली. कंत्राटदारांची गाºहाणी शाश्वत सत्य आहे, असे ते म्हणाले. यावर्षी खड्डे दुरूस्ती कामाच्या निवीदा दोन वर्षे देखभाल दुरूस्ती तत्वावर निघाल्या. यावर्षी बुजविलेले खड्डे पूढील वर्षी उखडले तर मोफत दुरूस्त करून द्यावे लागणार आहेत. या निवीदांमध्ये गतवर्षीचे दर समाविष्ठ आहे. आता नवीन दर प्राप्त झालेत. यात २५ टक्के दर कमी करण्यात आले आहेत. त्यातच १२ टक्के जीएसटी, असे एकूण ३७ टक्के दर कमी झालेत. अशा स्थितीत कंत्राटदार काय काम करतील व त्याचा दर्जा काय राहणार, हा प्रश्नच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबतचे शासन निर्णय दररोज बदलत असल्याने कंत्राटदारही त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी वर्धा व आर्वी विभागाने ई-निविदा काढल्या. यात दरामध्ये प्रचंड तफावत आढळून येत आहे. परिणामी, वाढीव दर मागणार नाही, असे लिहून देण्यासाठी अधिकारी कंत्राटदारांवर दबाव टाकत आहे. यामुळे काम जुन्या दराने स्वीकृत करणे बंधनकारक असताना अधिकारी वरिष्ठांचे आदेश पाळावपे लागतात, असे सांगत आहेत. कागदी घोडे नाचविण्याच्या तालात प्रत्यक्ष खड्डे दुरूस्ती कामाला हरताळ फासला जात आहे. पावसाळा संपला. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले. एकेका खड्ड्यात २०० फुटपर्यंत अनेक ठिकाणी खडी व मुरूमाची गरज आहे. आर्वी-पुलगाव, आर्वी-वर्धा, हिंगणघाट-वर्धा, खरांगणा-कोंढाळी, सुकळीबाई-बांगडापूर, तळेगाव-आष्टी-साहूर, आर्वी-तळेगाव, आर्वी-देऊरवाडा, वायफड, पुलगाव-वर्धा, वर्धा-सेलू, वर्धा-देवळी, वर्धा-सेवाग्राम-वर्धा या रस्त्यांची चाळणी झाली आहे. अपघाताची मालिका सुरूच आहे. सामान्यांना बांधकाम विभागाच्या भांडणाशी देणेघेणे नसते; पण त्रास त्यांनाच सहन करावा लागतो. यामुळे अधिकाºयांनी कंत्राटदारांचे प्रश्न सोडवून रस्त्याच्या दुरूस्तीची कामे मार्गी लावावी, ही अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.आधी जुने बिल द्या, मगचं नवीन कामेशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन नियमांबाबत कंत्राटदारांची मते जाणून घेतली असता कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर मिटकरी यांनी मुख्य अभियंता नागपूर, अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनी थकित देयके दिवाळीपर्यंत देऊ, अशी ग्वाही दिली होती. कंत्राटदार बांधकाम विभागात ठिय्या मांडून होते; पण सायंकाळपर्यंत निधी आला नाही. यामुळे ७४ कंत्राटदारांना निराश होऊन परतावे लागले. अशी फसवणूक आजपर्यंत झाली नव्हती. यामुळे आधी जुने बिल द्या व मग, नवीन कामे करू, अशी भूमिका घेतली आहे.आठ कोटींची देयके प्रलंबित२०१६-१७ मधील रस्ता डागडुजी कामांची आठ कोटींची देयके प्रलंबित आहे. कर्जबाजारी होऊन कंत्राटदारांनी व्याजाने पैसे घेत कामे केली. शासनाने वेळेत देयके अदा करणे गरजेचे होते; पण २०१७-१८ च्या नवीन कामांसाठी २५ टक्के निधी मंजूर केला. जुन्या देयकांना मात्र टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते.शासनाने नवीन अंदाजपत्रक काढले. यात जुन्या दरांपेक्षा २५ टक्के कमी नवीन दर आहे. यामुळे नवीन दराप्रमाणेच निवीदा स्वीकाराव्या लागतील. शासनाकडून जुन्या कामांच्या देयकासाठी निधी आलेला नाही. ही बाब मंत्रालयीन सचिव स्तरावरील असून यात आम्ही काहीही करू शकत नाही.- दत्तात्रय भोंडे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, आर्वी.