शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

जुने पं.स. सभागृह अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:58 IST

नवीन इमारती मिळाल्या की, जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होते. मग, त्या अडगळीत पडून अनेक समस्या निर्माण होतात.

ठळक मुद्देझुडपे व अस्वच्छता : सरपटणाºया प्राण्यांचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन इमारती मिळाल्या की, जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष होते. मग, त्या अडगळीत पडून अनेक समस्या निर्माण होतात. सध्या वर्धा पंचायत समिती सभागृहाचे तेच होत आहे. नवीन इमारत झाल्याने जुने पं.स. सभागृह अडगळीत पडले आहे. सध्या या इमारतीची दुरवस्था होत आहे. गटविकास अधिकाºयांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.काही वर्षांपूर्वी वर्धा पं.स. ला नवीन इमारत मिळाली. याच इमारतीत सर्व विभाग तथा सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जुने पं.स सभागृह अडगळीत पडले आहे. त्या इमारतीकडे सहसा कुणाचे लक्ष जात नसल्याने तेथे अस्वच्छता पसरली असून झुडपे वाढली आहेत. परिणामी, सरपटणाºया प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. जुन्या सभागृहाच्या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय त्या परिसरात जाणारे रस्तेही बंद करण्यात आले नाही. यामुळे कुणीही जुन्या पं.स. सभागृह परिसरात सहज जाऊ शकतो. यामुळे अनैतिक प्रकारांनाही या परिसरात उधान आल्याचे दिसून येत आहे. घाणीच्या साम्राज्याने कर्मचारी तथा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी पंचायत समिती प्रशासन मात्र याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.अनेक कार्यालये भाडेतत्वावरशासनाच्या अनेक विभागांचा कारभार प्रशासकीय भवन व शासकीय इमारती असताना भाडेतत्वावरील इमारतीत आहे. वर्धा पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्याने जुनी इमारत अन्य एखाद्या शासकीय कार्यालयाला भाडेतत्वावर देता आली असती; पण तसे कुठलेही प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. शासकीय कार्यालयांसाठी खासगी इमारत धारकांना पैसा दिला जात आहे. शासकीय इमारतींची मात्र दुर्लक्षामुळे दुरवस्था होत असल्याचे दिसून येत आहे.स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे आरोग्याला धोकावर्धा पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्यामुळे जुन्या सभागृहाच्या इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. यातील स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याची परिसरात दुर्गंधी येत असल्याने कर्मचाºयांना तेथे काम करणे कठीण होते. शिवाय दुर्गंधीमुळे कर्मचारी तथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटविकास अधिकाºयांनी याकडे लक्ष देत इमारतीचा वापर करणे वा स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे.