शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोहीत्र बंद असल्याने ओलित ठप्प

By admin | Updated: October 12, 2014 23:47 IST

सेलू तालुक्यातील पहेलानपूर येथील रोहीत्र तीन महिन्यांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून रोहित्राची दुरुस्ती केली नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे ओलिताचे काम ठप्प झाले आहे. आॅक्टोबरचा ‘हीट’ मुळे

वर्धा : सेलू तालुक्यातील पहेलानपूर येथील रोहीत्र तीन महिन्यांपूर्वी जळाले होते. तेव्हापासून रोहित्राची दुरुस्ती केली नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे ओलिताचे काम ठप्प झाले आहे. आॅक्टोबरचा ‘हीट’ मुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीके करपत असल्याने पिकांना ओलित करणे आवश्यक आहे. पावसाने महिनाभरापासून दडी मारली असल्याने पिकांना पाणी न दिल्यास ती सुकण्याचा धोका आहे. मात्र वीजपुरवठा नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार नोंदवली. मात्र रोहित्राची दुरुस्ती करुन वीज पुरवठा पूर्ववत करण्याची तसदी घेतली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. याबाबत वीज वितरण विभागाकडे तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले. यंदा पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यानंतर कसेबसे करुन पिकांना वाचविले आता. मात्र सर्व साधणे उपलब्ध असताना पीक वाचविणे शक्य नसल्याने हाती आलेले पीक गमावण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. तीन महिन्यांपासून रोहित्र बंद आहेत मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडे देयक थकीत असल्यास वसूली करीता तगादा लावतात.मात्र ही तत्परता तक्रारींचा निपटारा करण्यात दाखवली जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून घरगुती उपकरणे यामुळे प्रभावित होतात. मात्र वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना याचे सोयर सूतक नसल्याचे दिसून येते. अनेकदा तक्रार करूनही तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती केली जात नसून समस्या जैसे थे राहत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)