शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:39 IST

दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे.

ठळक मुद्देघरांची पडझड : कामे खोळंबली, शेतकऱ्यांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली असून शेतातही पाणी साचले आहे. शेतातील कामे खोळंबल्यामुळे पिकेही आता धोक्यात आली आहे. प्रारंभी पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.आठही तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून सततधार सुरु आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५२३.१३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५६.८२ असून या सततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी मोठ्या व मध्यम जलाशयाच्या पातळीतही वाढ झाली आहे. पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरल आहे. तर नांद प्रकल्पात ६६.६९ टक्के जलसाठा असल्याने या प्रकल्पाचे ३ गेट २० सेमीने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ५३.६०४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच लाल नाला प्रकल्प ८७.२१ टक्के भरला असून या प्रकल्पाचे ५ गेट १० सेमी. उघडले असून ३०.८० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्धा कार नदी प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने कारंजा तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.आष्टी- साहूर-वरूड मार्ग बंदसााहूर - धाडी येथील जांब नदीवरील नवनिर्माण पुलाजवळ बनविण्यात आलेला वळणमार्ग आठ दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेल्याने आष्टी-साहूर- वरूड या मार्गावरील वाहतूक पुर्णत: बंद झाली आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गाने वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बुधवारी सकाळी ७ वाजतादरम्यान जांब नदीला पूर आला. या पुरात वळणमार्ग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी व रुग्णांना सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून पंचाळा व झाडगाव रस्त्याने ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांकडून कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. याबाबत आर.आर. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता पाऊस कमी झाल्यानंतर रपटा तयार करण्यात येईल, असे सांगितले. पण, गुरुवारीही पाऊस कायम असल्याने पुन्हा पुराचे पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर