शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:39 IST

दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे.

ठळक मुद्देघरांची पडझड : कामे खोळंबली, शेतकऱ्यांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली असून शेतातही पाणी साचले आहे. शेतातील कामे खोळंबल्यामुळे पिकेही आता धोक्यात आली आहे. प्रारंभी पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.आठही तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून सततधार सुरु आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५२३.१३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५६.८२ असून या सततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी मोठ्या व मध्यम जलाशयाच्या पातळीतही वाढ झाली आहे. पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरल आहे. तर नांद प्रकल्पात ६६.६९ टक्के जलसाठा असल्याने या प्रकल्पाचे ३ गेट २० सेमीने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ५३.६०४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच लाल नाला प्रकल्प ८७.२१ टक्के भरला असून या प्रकल्पाचे ५ गेट १० सेमी. उघडले असून ३०.८० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्धा कार नदी प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने कारंजा तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.आष्टी- साहूर-वरूड मार्ग बंदसााहूर - धाडी येथील जांब नदीवरील नवनिर्माण पुलाजवळ बनविण्यात आलेला वळणमार्ग आठ दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेल्याने आष्टी-साहूर- वरूड या मार्गावरील वाहतूक पुर्णत: बंद झाली आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गाने वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बुधवारी सकाळी ७ वाजतादरम्यान जांब नदीला पूर आला. या पुरात वळणमार्ग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी व रुग्णांना सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून पंचाळा व झाडगाव रस्त्याने ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांकडून कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. याबाबत आर.आर. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता पाऊस कमी झाल्यानंतर रपटा तयार करण्यात येईल, असे सांगितले. पण, गुरुवारीही पाऊस कायम असल्याने पुन्हा पुराचे पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर