शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:39 IST

दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे.

ठळक मुद्देघरांची पडझड : कामे खोळंबली, शेतकऱ्यांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली असून शेतातही पाणी साचले आहे. शेतातील कामे खोळंबल्यामुळे पिकेही आता धोक्यात आली आहे. प्रारंभी पावसाअभावी तर आता पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.आठही तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून सततधार सुरु आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ५२३.१३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५६.८२ असून या सततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी मोठ्या व मध्यम जलाशयाच्या पातळीतही वाढ झाली आहे. पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरल आहे. तर नांद प्रकल्पात ६६.६९ टक्के जलसाठा असल्याने या प्रकल्पाचे ३ गेट २० सेमीने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ५३.६०४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच लाल नाला प्रकल्प ८७.२१ टक्के भरला असून या प्रकल्पाचे ५ गेट १० सेमी. उघडले असून ३०.८० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्धा कार नदी प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने कारंजा तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.आष्टी- साहूर-वरूड मार्ग बंदसााहूर - धाडी येथील जांब नदीवरील नवनिर्माण पुलाजवळ बनविण्यात आलेला वळणमार्ग आठ दिवसात दुसऱ्यांदा वाहून गेल्याने आष्टी-साहूर- वरूड या मार्गावरील वाहतूक पुर्णत: बंद झाली आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गाने वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केल्याने बुधवारी सकाळी ७ वाजतादरम्यान जांब नदीला पूर आला. या पुरात वळणमार्ग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी व रुग्णांना सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून पंचाळा व झाडगाव रस्त्याने ३० ते ४० कि.मी.अंतरावरुन ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांकडून कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त होत आहे. याबाबत आर.आर. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता पाऊस कमी झाल्यानंतर रपटा तयार करण्यात येईल, असे सांगितले. पण, गुरुवारीही पाऊस कायम असल्याने पुन्हा पुराचे पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर