शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१६ मंडळांकडेच अधिकृत वीज मीटर

By admin | Updated: September 11, 2016 00:36 IST

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे.

महावितरणलाच शॉक : अनधिकृत जोडण्यांवरच गणेशोत्सवातील रोषणाईप्रशांत हेलोंडे  वर्धागणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले होते; पण गणेश मंडळांनी महावितरणला ठेंगाच दाखविला आहे. जिल्ह्यात तब्बल २०४ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. असे असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ गणेश मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे उर्वरित मंडळांचा गणेशोत्सव अनधिकृत वीज जोडणीवरच साजरा होताना दिसतो.वर्धा जिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची नोंदणी पोलिसांकडे झाली आहे. या व्यतिरिक्त लहान-मोठे अनेक मंडळे आहेत. या मंडळांची नोंदणी झालेली नसल्याचेच दिसते. यामुळे गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी आणि देखावे लक्षात घेता अनधिकृत वीज जोडणी वेळप्रसंगी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही मंडळांकडे कायम वीज जोडणी असण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक गणेश मंडळांद्वारे जवळच्या महावितरणच्या खांबांवरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतली जात असल्याचेच दिसते. शिवाय गणेशोत्सवाचा कालावधी दहा दिवसांचा असतो. केवळ दहाच दिवसांसाठी कशाला अधिकृत वीज जोडणी घ्यायची, असा विचार करून अनेक गणेश मंडळे अनधिकृत वीज जोडणी घेत असल्याचेच दिसते. काहींनी मंडळातील सदस्य, परिसरातील व्यापारी, दुकाने, चक्की तसेच मिळेल तेथून तात्पूरती वीज जोडणी घेतल्याचे दिसते. महावितरणच्या वर्धा उपविभागात सर्वाधिक ११ तात्पूरत्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश जोडण्या वर्धा शहरातील असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंगणघाट उपविभागातील केवळ एकाच सार्वजनिक गणेश मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेतली तर आर्वी विभागातील चार गणेश मंडळांना तात्पूरती जोडणी देण्यात आली आहे.अनधिकृत वीज जोडण्या घेतल्या जाऊ नये, कुणाच्या घर, दुकानातून वीज घेऊ नये वा विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरणने घरगुती वीज दरांपेक्षाही कमी दरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पूरती वीज जोडणी देऊ केली होती. या योजनेबाबत जिल्ह्यात बऱ्यापैकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला; पण गणेश मंडळांनी या योजनेला प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून येत आहे. २०४ नोंदणी झालेल्या मंडळांपैकी केवळ १६ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली. यामुळे अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर महावितरणकडून काय कार्यवाही केली जाते, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.कमी दरातील वीज पुरवठ्यालाही नकारचमहावितरणने धार्मिक उत्सवासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तात्पुरते मीटर बसविण्याचा खटाटोप करायलाही महावितरण तयार होते. जनजागृतीही केली. सार्वजनिक गणेश मंडळांना सूचनाही दिल्या; पण गणेश मंडळांना स्वस्तातील अधिकृत वीज जोडणी नकोच, असेच दिसते. शनिवारपर्यंत १६ मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतल्याने इतरांचे काय, हा प्रश्नच आहे. सर्वच मंडळांमध्ये रोषणाईजिल्ह्यात २०४ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झालेली आहे. यातील बहुतांश मंडळांनी आकर्षक रोषणाई केली तर काहींनी विजेची बचत करीत कमी विद्युत व्यवस्था ठेवली. असे असले तरी त्यांना विजेची गरज पडत आहे. मग, त्यांनी अधिकृत वीज जोडणी का घेतली नाही, हा प्रश्नच आहे.कार्यवाहीकडे सर्वांचे लक्षअनधिकृत वीज जोडणी घेताना धोका होण्याची शक्यताच अधिक असते. कुठे वायरचा तर कुठे मीटर वा खांबावर धोका होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले होते; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता महावितरण अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारी अभियंता सदावर्ते यांना विचारणा केली असता अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर कार्यवाही केली जात आहे, असे सांगितले.