शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पंचायत राज समितीच्या दौऱ्याने अधिकारी, कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:44 IST

राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे.

ठळक मुद्देआज होणार जिल्ह्यात दाखल : विविध कार्यालयांची पाहणी करीत जाणून घेणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे. बुधवार ८ रोजी सकाळी १० वाजता ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असून काही कामचुकार अधिकारी यामुळे धास्तावलेच आहेत.जिल्ह्यातील विधीमंडळाच्या सदस्यांशी विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा ते करणार आहेत. त्यानंतर १०.३० ते ११ वाजता दरम्यान जि.प.च्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. सकाळी ११ वाजता सन २०१३-१४ लेखा परीक्षा पुनर्वविलोकन अहवालातील वर्धा जि.प.च्या संबंधी परिछेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. गुरुवार ९ आॅगस्टला समिती पंचायत समित्यांना भेट देणार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रा.पं., पं.स.च्या गटविकास अधिकारी यांची झाडाझडतीच ते घेणार आहेत. १० आॅगस्टला जि.प.च्या सन २०१४-१५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात जि.प.च्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. असे असले तरी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे सध्या संपावर आहेत. समितीच्या दौऱ्याच्या दिवशी ग्रामीण भागात शासकीय कार्यालय बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समिती काय भूमिका घेते याकडे कर्मचाºयांचे लक्ष आहे.दोन महिन्यांपासून तयारी सुरूविधीमंडळाच्या विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या समितीत सहभागी आहेत. ते जिल्ह्याच्या कोणत्या भागात दौर करतात याविषयी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता मागील दीड ते दोन महिन्यांपासून या समितीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मागील महिन्यात या समितीचा दौरा निश्चित झाला होता. मात्र, नागपूर अधिवेशनामुळे तो बारगळला. आता या समितीच्या आगमनाविषयी उत्सुकता आहे.ग्रामपंचायतींची अस्वच्छता तपासाग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सध्या केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असले तरी या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दौऱ्याच्यानिमित्ताने आढावा घ्यावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती