शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पंचायत राज समितीच्या दौऱ्याने अधिकारी, कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:44 IST

राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे.

ठळक मुद्देआज होणार जिल्ह्यात दाखल : विविध कार्यालयांची पाहणी करीत जाणून घेणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांची पाहणी, तपासणी करणार आहे. बुधवार ८ रोजी सकाळी १० वाजता ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असून काही कामचुकार अधिकारी यामुळे धास्तावलेच आहेत.जिल्ह्यातील विधीमंडळाच्या सदस्यांशी विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा ते करणार आहेत. त्यानंतर १०.३० ते ११ वाजता दरम्यान जि.प.च्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. सकाळी ११ वाजता सन २०१३-१४ लेखा परीक्षा पुनर्वविलोकन अहवालातील वर्धा जि.प.च्या संबंधी परिछेदसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. गुरुवार ९ आॅगस्टला समिती पंचायत समित्यांना भेट देणार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. प्राथमिक शाळा, ग्रा.पं., पं.स.च्या गटविकास अधिकारी यांची झाडाझडतीच ते घेणार आहेत. १० आॅगस्टला जि.प.च्या सन २०१४-१५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात जि.प.च्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. असे असले तरी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक हे सध्या संपावर आहेत. समितीच्या दौऱ्याच्या दिवशी ग्रामीण भागात शासकीय कार्यालय बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समिती काय भूमिका घेते याकडे कर्मचाºयांचे लक्ष आहे.दोन महिन्यांपासून तयारी सुरूविधीमंडळाच्या विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य या समितीत सहभागी आहेत. ते जिल्ह्याच्या कोणत्या भागात दौर करतात याविषयी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता मागील दीड ते दोन महिन्यांपासून या समितीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मागील महिन्यात या समितीचा दौरा निश्चित झाला होता. मात्र, नागपूर अधिवेशनामुळे तो बारगळला. आता या समितीच्या आगमनाविषयी उत्सुकता आहे.ग्रामपंचायतींची अस्वच्छता तपासाग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सध्या केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवित असले तरी या पंचायत राज समितीने ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दौऱ्याच्यानिमित्ताने आढावा घ्यावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती