शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

व्याजाच्या वादात ७६० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:32 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसातबारा कोरा नसल्याने नव्या कर्जदाराची प्रतीक्षा : गत हंगामात झाले होते केवळ ४० टक्के कर्ज वितरण

रुपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ७६० कोटी रुपये करण्यात आले आहे. या व्याजाच्या वादाने यंदा कर्जवाटप प्रभावित होण्याची शक्यता आहे.गत खरीप हंगामात जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७३० कोटी रुपये होते. याच काळात कर्जमाफीची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याकडे पाठ केली. परिणामी जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४० टक्क्यावर राहिले. या नव्या हंगामातही अशीच स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बँकेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे त्यांना नवे कर्ज मिळणार आहे. तर सातबारावर कर्जाचा बोझा कायम असलेल्या शेतकऱ्यांना तर नियमानुसार कर्ज मिळणे शक्य नसल्न्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे व्याजाच्या रकमेबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बँकांनी कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारू नये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. बँकांनी त्यांची ही घोषणा अमान्य करीत व्याज आकारणी कायम ठेवली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा अध्याप कोरा झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नव्या कर्जातून व्याज कपातीचा जिल्हाधिकाºयांचा प्रस्तावमुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले. जोपर्यंत शेतकरी ही रक्कम भरणार नाही तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय बँका कर्ज देणार नाही अशी स्थिती असल्याने यावर मार्ग काढण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या कर्जातून जुन्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करावी असा प्रस्ताव ठेवला. यावर बँका सध्या चुप्पी साधून असल्याने दिसते. शिवाय शेतकरीही याबाबत शांत आहेत.शेतकऱ्यांकडून रक्कम भरण्याकडे दुर्लक्षकर्जमाफी झाल्यानंतर तिची रक्कम खात्यात जमा करण्याला विलंब झाला. यामुळे कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले. ही रक्कम माफ होण्याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. यामुळे त्यांचे रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रक्कम शासन देईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तसे होण्याची शाश्वती नसल्याने सातबारा कोरा होणे सध्यातरी शक्य नसल्याचे दिसते.हंगाम तोंडावरखरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना व्याजाच्या रकमेचा घोळ कायम असल्याने कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोझा कायम आहे. आता शेतकऱ्यांकडून नव्या कर्जाकरिता बँकेत जाणे आता सुरू होईल. यामुळे यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.