शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

व्याजाच्या वादात ७६० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:32 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसातबारा कोरा नसल्याने नव्या कर्जदाराची प्रतीक्षा : गत हंगामात झाले होते केवळ ४० टक्के कर्ज वितरण

रुपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ७६० कोटी रुपये करण्यात आले आहे. या व्याजाच्या वादाने यंदा कर्जवाटप प्रभावित होण्याची शक्यता आहे.गत खरीप हंगामात जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७३० कोटी रुपये होते. याच काळात कर्जमाफीची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याकडे पाठ केली. परिणामी जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४० टक्क्यावर राहिले. या नव्या हंगामातही अशीच स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बँकेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे त्यांना नवे कर्ज मिळणार आहे. तर सातबारावर कर्जाचा बोझा कायम असलेल्या शेतकऱ्यांना तर नियमानुसार कर्ज मिळणे शक्य नसल्न्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे व्याजाच्या रकमेबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बँकांनी कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारू नये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. बँकांनी त्यांची ही घोषणा अमान्य करीत व्याज आकारणी कायम ठेवली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा अध्याप कोरा झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नव्या कर्जातून व्याज कपातीचा जिल्हाधिकाºयांचा प्रस्तावमुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले. जोपर्यंत शेतकरी ही रक्कम भरणार नाही तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय बँका कर्ज देणार नाही अशी स्थिती असल्याने यावर मार्ग काढण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या कर्जातून जुन्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करावी असा प्रस्ताव ठेवला. यावर बँका सध्या चुप्पी साधून असल्याने दिसते. शिवाय शेतकरीही याबाबत शांत आहेत.शेतकऱ्यांकडून रक्कम भरण्याकडे दुर्लक्षकर्जमाफी झाल्यानंतर तिची रक्कम खात्यात जमा करण्याला विलंब झाला. यामुळे कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले. ही रक्कम माफ होण्याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. यामुळे त्यांचे रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रक्कम शासन देईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तसे होण्याची शाश्वती नसल्याने सातबारा कोरा होणे सध्यातरी शक्य नसल्याचे दिसते.हंगाम तोंडावरखरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना व्याजाच्या रकमेचा घोळ कायम असल्याने कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोझा कायम आहे. आता शेतकऱ्यांकडून नव्या कर्जाकरिता बँकेत जाणे आता सुरू होईल. यामुळे यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.