शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

व्याजाच्या वादात ७६० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:32 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसातबारा कोरा नसल्याने नव्या कर्जदाराची प्रतीक्षा : गत हंगामात झाले होते केवळ ४० टक्के कर्ज वितरण

रुपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ७६० कोटी रुपये करण्यात आले आहे. या व्याजाच्या वादाने यंदा कर्जवाटप प्रभावित होण्याची शक्यता आहे.गत खरीप हंगामात जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७३० कोटी रुपये होते. याच काळात कर्जमाफीची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याकडे पाठ केली. परिणामी जिल्ह्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ ४० टक्क्यावर राहिले. या नव्या हंगामातही अशीच स्थिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बँकेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे त्यांना नवे कर्ज मिळणार आहे. तर सातबारावर कर्जाचा बोझा कायम असलेल्या शेतकऱ्यांना तर नियमानुसार कर्ज मिळणे शक्य नसल्न्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे व्याजाच्या रकमेबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.बँकांनी कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारू नये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. बँकांनी त्यांची ही घोषणा अमान्य करीत व्याज आकारणी कायम ठेवली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा अध्याप कोरा झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नव्या कर्जातून व्याज कपातीचा जिल्हाधिकाºयांचा प्रस्तावमुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे बँकांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले. जोपर्यंत शेतकरी ही रक्कम भरणार नाही तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. आणि सातबारा कोरा झाल्याशिवाय बँका कर्ज देणार नाही अशी स्थिती असल्याने यावर मार्ग काढण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या कर्जातून जुन्या कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करावी असा प्रस्ताव ठेवला. यावर बँका सध्या चुप्पी साधून असल्याने दिसते. शिवाय शेतकरीही याबाबत शांत आहेत.शेतकऱ्यांकडून रक्कम भरण्याकडे दुर्लक्षकर्जमाफी झाल्यानंतर तिची रक्कम खात्यात जमा करण्याला विलंब झाला. यामुळे कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले. ही रक्कम माफ होण्याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. यामुळे त्यांचे रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रक्कम शासन देईल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तसे होण्याची शाश्वती नसल्याने सातबारा कोरा होणे सध्यातरी शक्य नसल्याचे दिसते.हंगाम तोंडावरखरीप हंगाम तोंडावर आला आहे. असे असताना व्याजाच्या रकमेचा घोळ कायम असल्याने कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोझा कायम आहे. आता शेतकऱ्यांकडून नव्या कर्जाकरिता बँकेत जाणे आता सुरू होईल. यामुळे यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.