शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ओबीसींची शिष्यवृत्ती अडली

By admin | Updated: July 11, 2017 01:01 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे. ओबीसींची वेबसाईट बंद करून १४ लाख ओबीसी विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती व शुल्क परतावा थांबविला. ओबीसींना गाजर दाखवून दिलेल्या स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला सहा महिन्यानंतर साधा चपराशी सुद्धा नाही. ओबीसी वरील अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.मागणीचा विचार न झाल्यास भाजपच्या ओबीसी मंत्री, खासदार, आमदारांच्या निवासस्थानी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बँडबाजा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपा सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. ओबीसींचे आरक्षण मागच्या दाराने रद्द करून, त्या जागा खुल्या प्रवर्गातील घटकांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. भाजपाने निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण करून विविध आमिष देत सत्ता प्राप्त केली. परंतु, निवडणुकीनंतर सरकार ओबीसींचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा या ओबीसींसाठी आरक्षित असायला पाहिजे. परंतु, देशभरात मेडिकल मधील प्रवेशासाठी केवळ ६८ जागा देवून केवळ १.८३ टक्के एवढेच ओबीसी आरक्षण ठेवून केंद्र सरकारने ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची खिल्ली उडवित असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढून ओबीसींवरील होणारा अन्याय दूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, भरत चौधरी, जयवंत भालेराव, अभय पुसदकर, संजय भगत, विनय वासेकर, वासुदेव ढुमणे, केशव तितरे आदी उपस्थित होते.