शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

ओबीसींची शिष्यवृत्ती अडली

By admin | Updated: July 11, 2017 01:01 IST

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. केंद्रात केवळ दोन टक्के आहे. ओबीसींची वेबसाईट बंद करून १४ लाख ओबीसी विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती व शुल्क परतावा थांबविला. ओबीसींना गाजर दाखवून दिलेल्या स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला सहा महिन्यानंतर साधा चपराशी सुद्धा नाही. ओबीसी वरील अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.मागणीचा विचार न झाल्यास भाजपच्या ओबीसी मंत्री, खासदार, आमदारांच्या निवासस्थानी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बँडबाजा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपा सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. ओबीसींचे आरक्षण मागच्या दाराने रद्द करून, त्या जागा खुल्या प्रवर्गातील घटकांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. भाजपाने निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण करून विविध आमिष देत सत्ता प्राप्त केली. परंतु, निवडणुकीनंतर सरकार ओबीसींचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा या ओबीसींसाठी आरक्षित असायला पाहिजे. परंतु, देशभरात मेडिकल मधील प्रवेशासाठी केवळ ६८ जागा देवून केवळ १.८३ टक्के एवढेच ओबीसी आरक्षण ठेवून केंद्र सरकारने ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची खिल्ली उडवित असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढून ओबीसींवरील होणारा अन्याय दूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, भरत चौधरी, जयवंत भालेराव, अभय पुसदकर, संजय भगत, विनय वासेकर, वासुदेव ढुमणे, केशव तितरे आदी उपस्थित होते.