शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी.

ठळक मुद्देसंजीवकुमार : उपाययोजनांचा घेतला आढावा, लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने कोरोना तपासणी करण्याबाबत दिलेत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, वास व चव न समजणे, श्वास घेण्यास त्रास, डायरिया आणि एन्फ्लुएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अधिकाधिक चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्णांचा शोध लागून लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबविता येईल, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी दिल्या.जिल्हा परिषद सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्यात राबविलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध प्राथमिक अवस्थेत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वेक्षणाचा दररोज आढावा घेण्यात यावा. रोज गाव-वॉर्डनिहाय तपासण्यात आलेल्या रुग्णांची यादी करून त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. यासोबतच गावागावात हॅण्डवॉश स्टेशन तयार करावेत, तेथे पुढील तीन महिने हॅण्डवॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही आवश्यक असून त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्यात.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.कामगिरीबद्दल अधिकाऱ्यांना कौतुकाची थापवर्धा जिल्ह्याने कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याबाबत त्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. जिल्ह्याने आतापर्यंत केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र, आता यापुढे जिल्हाबंदी उठल्यानंतर, परिवहन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे संजीवकुमार म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या