शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी.

ठळक मुद्देसंजीवकुमार : उपाययोजनांचा घेतला आढावा, लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने कोरोना तपासणी करण्याबाबत दिलेत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप, वास व चव न समजणे, श्वास घेण्यास त्रास, डायरिया आणि एन्फ्लुएन्झा सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अधिकाधिक चाचण्या झाल्यास प्राथमिक अवस्थेत रुग्णांचा शोध लागून लवकर उपचार होतील आणि त्यांच्या माध्यमातून होणारा रोगाचा प्रसार थांबविता येईल, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी दिल्या.जिल्हा परिषद सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्यात राबविलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे उपस्थित होते.जिल्ह्यातील कोरोना तपासणीच्या संख्येत वाढ होण्याची गरज असून यासाठी गाव आणि नगरपालिकास्तरावर पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षणाविषयीची माहिती गावातील नागरिक आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेला करून द्यावी. सर्वेक्षण पथकाने शोधलेल्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत अशा रुग्णांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अहवालानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध प्राथमिक अवस्थेत होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वेक्षणाचा दररोज आढावा घेण्यात यावा. रोज गाव-वॉर्डनिहाय तपासण्यात आलेल्या रुग्णांची यादी करून त्यांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. यासोबतच गावागावात हॅण्डवॉश स्टेशन तयार करावेत, तेथे पुढील तीन महिने हॅण्डवॉश मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही आवश्यक असून त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्यात.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व तहसीलदार, जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.कामगिरीबद्दल अधिकाऱ्यांना कौतुकाची थापवर्धा जिल्ह्याने कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याबाबत त्यांचे कौतुक करून शाबासकी दिली. जिल्ह्याने आतापर्यंत केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र, आता यापुढे जिल्हाबंदी उठल्यानंतर, परिवहन सुरू झाल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे संजीवकुमार म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या