शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

न.प. मार्गावर अपघाताची शक्यता

By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST

नगर परिषद कार्यालयासमोरून पोस्ट आॅफिसकडे जात असलेल्या जेल रोड मार्गावर मध्यभागी अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे.

वर्धा : नगर परिषद कार्यालयासमोरून पोस्ट आॅफिसकडे जात असलेल्या जेल रोड मार्गावर मध्यभागी अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. नगर परिषदेसमोरून जात असलेल्या जेल रोडचे काही वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. पोस्ट आॅफिसपर्यंत हा रस्ता बांधण्यात आला असला तरी मध्यभागी १०० ते २०० मिटरचा पट्ट्यात मात्र रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अद्यापही तसाच उखडलेला आहे. या मार्गावर गिट्टी उखडली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. बसस्थानकाकडून नागपूरकडे जात असलेल्या बसेस पोस्ट आॅफिसकडून वळत्या होऊन जेल रोडने नागपूरकडे जातात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही मध्यमागी उखडलेल्या रत्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याचा वाहकचालकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गिट्टी परिसरात सर्वत्र पसरली असल्याने मोठा वाहनांच्या टायरने अनेकदा गोटे उडून ये-जा करणाऱ्यांना लागत असल्याच्या घटनाही अनेकदा घडत असतात. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, सामाजिक बांधकाम विभाग आणि न. प. मुख्याधिकारी आदींना देण्यात आल्या असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)