शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:47 IST

मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.

ठळक मुद्दे१९५० टोल फ्री क्रमांक : जिल्हा संपर्क केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असून पूर्वतयारीने वेग घेतला आहे. या निवडणुकीबाबत नागरिक व मतदारांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन व्हावे, निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १९५० वर फोन करून संपर्क करता येणार आहे. सुटीचा दिवस वगळून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या केंद्रात संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हे केंद्र २४ तास सुरू ठेवले जाणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लॅन्डलाईन क्रमांकावरून उपलब्ध करून दिली असून लवकरच मोबाईलवरूनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.असा निवडला १९५० क्रमांकनिवडणूक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १०५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाची स्थापना झालेले वर्ष १९५० लक्षात घेऊनच निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी १९५० क्रमांकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: १९५० या कमांकावर संपर्क या सेवेचे उद्घाटन केले आहे.आगामी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी व त्यांच्या मतदारयादी व निवडणूकविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक व मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.