शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:47 IST

मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.

ठळक मुद्दे१९५० टोल फ्री क्रमांक : जिल्हा संपर्क केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असून पूर्वतयारीने वेग घेतला आहे. या निवडणुकीबाबत नागरिक व मतदारांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन व्हावे, निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १९५० वर फोन करून संपर्क करता येणार आहे. सुटीचा दिवस वगळून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या केंद्रात संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हे केंद्र २४ तास सुरू ठेवले जाणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लॅन्डलाईन क्रमांकावरून उपलब्ध करून दिली असून लवकरच मोबाईलवरूनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.असा निवडला १९५० क्रमांकनिवडणूक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १०५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाची स्थापना झालेले वर्ष १९५० लक्षात घेऊनच निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी १९५० क्रमांकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: १९५० या कमांकावर संपर्क या सेवेचे उद्घाटन केले आहे.आगामी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी व त्यांच्या मतदारयादी व निवडणूकविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक व मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.