शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आता एका कॉलवर मतदारांना मिळेल माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:47 IST

मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.

ठळक मुद्दे१९५० टोल फ्री क्रमांक : जिल्हा संपर्क केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदारयादीमध्ये नाव आहे का, नावाचा समावेश कसा करावा, नावामध्ये दुरुस्ती कशी करावी यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती आता एका कॉलवर जिल्ह्यातील मतदारांना मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र सुरू केले आहे. टोल फ्री क्रमांक १९५० यावर संपर्क करून या केंद्रामध्ये संपर्क साधता येणार आहे.लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असून पूर्वतयारीने वेग घेतला आहे. या निवडणुकीबाबत नागरिक व मतदारांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन व्हावे, निवडणूक प्रणालीबाबत त्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा निवडणूक शाखेमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १९५० वर फोन करून संपर्क करता येणार आहे. सुटीचा दिवस वगळून रोज कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये या केंद्रात संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हे केंद्र २४ तास सुरू ठेवले जाणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लॅन्डलाईन क्रमांकावरून उपलब्ध करून दिली असून लवकरच मोबाईलवरूनसुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.असा निवडला १९५० क्रमांकनिवडणूक विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १०५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाची स्थापना झालेले वर्ष १९५० लक्षात घेऊनच निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी १९५० क्रमांकाची निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: १९५० या कमांकावर संपर्क या सेवेचे उद्घाटन केले आहे.आगामी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यात नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी व त्यांच्या मतदारयादी व निवडणूकविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने १९५० हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिक व मतदारांनी त्याचा लाभ घ्यावा.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.