शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

मेंदूची गरज नसल्याने आता तोही काढावा लागेल

By admin | Updated: November 16, 2015 00:36 IST

आम्ही कृत्रिम गरजा निर्माण करतो आहोत. याची सुरुवात कॅल्क्यूलेटर पासून झाली असून आता ती इंटरनेट व मोबाईलपर्यंत पोहचली

चंद्रशेखर धर्माधिकारी : पवनार येथे मित्र मिलन सोहळापवनार : आम्ही कृत्रिम गरजा निर्माण करतो आहोत. याची सुरुवात कॅल्क्यूलेटर पासून झाली असून आता ती इंटरनेट व मोबाईलपर्यंत पोहचली. मनुष्याला आपल्या मेंदूचा वापरच करायची गरज या साधनांमुळे नाही. माणसाची उत्पत्ती ही बंदरापासून झाली, तेव्हा त्याला शेपूट होते. शेपटाची गरज नसल्यामुळे ते काढून टाकण्यात आले, आता मेंदूची गरज नसल्यामुळे तोही काढावा लागेल असे परखड मत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. पवनार येथील ब्रह्मविद्या आश्रम येथे रविवारपासून आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण सोहळ्यानिमित्त मित्र मिलन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम सकाळी ९.३० वाजता आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. सेवाग्राम-पवनार विकास आराखड्याबाबत आम्ही सरकारचा पैसा घेणार नाही, या भूमिकेवरही धर्माधिकारी यांनी कठोर टिका केली. सरकारचा पैसा चालत नाही मग धनाढ्यांनी दिलेला पैसा कसा चालतो. त्यांनी दिलेला पैसा खरच शुद्ध असतो का असा सवालही त्यांनी केला. गांधी आश्रमची सद्यस्थितीत काय अवस्था आहे, यावर चिंतन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला ब्रह्मविद्या मंदिरचे गौतमभाई बजाज यांनी विचार मांडताना आश्रम मोठा होत असेल तर त्याचे बाह्यरूपही मोठे होत जाते. पण त्याच वेळी आतल्या गोष्टी छोट्या छोट्या होत जातात. तेव्हा आश्रम छोटा असला तरी चालेल परंतु त्याचे आंतरिक रूप मोठे असावयास पाहिजे असे ते म्हणाले. सोहळ्यामध्ये बालभाई, डॉ. जाजू, शत्रुघ्न झॉजी यानीही आपले विचार व्यक्त केले. तीन दिवस चालणाऱ्या मित्र मिलन सोहळ्यामध्ये जय जगत या विषयावर व्यापक चिंतन होणार आहे.(वार्ताहर)